“आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या पाठीशी भोई फाउंडेशन खंबीरपणे उभा राहील, डॉ मिलिंद भोई
रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न..”
अर्धापूर दि. २५(प्रतिनिधी) आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुण्यजागर प्रकल्प सुरू केला आहे .या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
आत्महात्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या पाठीशी भोई फाउंडेशन खंबीरपणे उभा राहिल.समाजाच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू असुन हा शिक्षणाचा जगन्नाथाचा रथ समाजाच्या सहकाऱ्यांने ओढला जात आहे, असे प्रतिपादन भोई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ मिलिंद भोई यांनी रविवारी (ता २५). केले.
पुण्यातील भोई फाउंडेशनच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.
गेल्या आठ वर्षांपासून पुण्यजागर प्रकल्प सुरू आहे.पुण्यजागर परिवार व तालुका पत्रकार संघाच्या वतीने नांदेड शहरातील मुक्तेश्वर आश्रामात रक्षाबंधनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला अर्धापूर तालुक्यातील कोंढा, अर्धापूर, मालेगाव,धामदरी,दिग्रस, येळेगाव आदी गावातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते .
यावेळी गोविंद गुरु,नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड किशोर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर विश्वांभर पवार, प्रा डॉ बालाजी कोमपलवार, डॉ रघुनाथ शेटे , माजी जिल्हा परिषद सदस्य रामराम भालेराव,आवघुत कदम, विलास साबळे,बाळु पाटील धुमाळ, हेमंत गोसावी पल्लवी वाघ गितांजली देगावकर डॉ उज्ज्वला पुरंदरे, सुधाकर टाक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पुण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे यांनी करून प्रकल्पा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.तर आभार नागोराव भांगे यांनी यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुणवंत विरकर, दत्ता टोकलवाड, निळकंठ मदने यांनी पुढाकार घेतला.यावेळी नामदेव बट्टेवाड, रामचंद्र वनलवाड, बालाजी डुबुकवाड, शिरीष टोकलवाड, व्यंकटी नागलवाड आदी उपस्थित होते.
पुयजागर प्रकल्पाला सहकार्य करू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी भोई फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम आहे.शेतकरी कुटुंबांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.पुण्यजागर प्रकल्पाला सहकार्य करण्याची ग्वाही संजय देशमुख लहानकर,अॅड किशोर देशमुख, इंजिनिअर विश्वांभर पवार यांनी दिली .
Discussion about this post