भुम तालुका प्रतिनिधी
भुम तालुक्यातील निपाणी येथे सातत्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे,भर
पावसाळ्यात विहीरीत पाणी असुनही केवळ ग्रा.पं.च्या ढिसाळ कारभारामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पंप नादुरुस्त आहे
जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही ग्रामस्थांना यांचा १महिन्यापासुन त्रास सहन करावा लागत आहे, याआधीही निपाणी गावाला नेहमीच पाण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे,आता पावसाळ्यातही पाणी मिळत नसल्याने गावकरी मेटाकुटीला आले आहेत , या नेहमीच्याच गैरसोयीमुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत, तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे, पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.







