भुम तालुका प्रतिनिधी
पाउस आमचा वैरी झालाय….
एवढा पाऊस पडलाय की
मोठाली तळी फूटल्यात काही धोकादायक झालेत, नद्यांनी नाल्यांनी तर केव्हाच पातळी सोडलीय आण
गावागावात घराघरात पाणी शिरलंय..
होती नव्हती तेवढी आमची सगळी पिक वाहून गेल्यात
ऊस लोळल्यात हाताशी आलेल्या सोयाबीनी तर पाण्यातच कुजायला लागल्यात,
तरकारी पीक तर केव्हाच उदध्वस्त झाल्यात.
आमची दुभती जनावरं मेल्यात शेळ्या मेंढ्या वाहून गेल्यात
गाव खेड्याशी संपर्क तुटलाय रस्ते ,पुल सगळं बरबाद झालय.
सरकार आमच्या शेतक-याच प्रचंड नूकसान झालंय
हातातोंडाशी आलेला घास गेलाय तो हतबल झालाय पोराची फीस कशी भरायची, दिवाळीनंतर पोरीचं लग्न कसं करायचं, सावकाराचं देणं कस भागवायचं, बँकेचं कर्ज कसं फेडायचं, पुढच्या पेरणीला खत कुठून आणायचं सणासुदीला कपडालत्ता कसा घ्यायचा सगळ्यांच्या विचारांना शेतकऱ्याला काय करावं हे समजत नाही…
आता सरकार म्हणून तुम्ही धीर द्यायला पाहिजे सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करा ,अनुदान द्या पीक विम्याचे पैसे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर द्या.
शेतकऱ्याला या संकटातुण उभा करण्याची सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे लोकप्रतिनिधींनी ती पार पाडावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना या संकटातून उभा राहण्यासाठी बळ द्यावं.




