भुम तालुका प्रतिनिधी
दिं. 23/9/2025
धाराशिवच्या पूरग्रस्तांचा आक्रोश सोशल मीडियावर; #ओला_दुष्काळ_जाहीर_करा हॅशटॅग ट्रेंडमध्ये
धाराशिव: जिल्ह्यात झालेल्या प्रलयंकारी पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे. या अभूतपूर्व नुकसानीनंतर आता पूरग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे न्यायाची मागणी करत सोशल मीडियावर एकच आवाज उठवला आहे.
#धाराशिव_ओला_दुष्काळ_जाहीर_करा हा हॅशटॅग वापरून हजारो नागरिक आणि शेतकरी आपल्या व्यथा मांडत आहेत. पुरात वाहून गेलेली जनावरं, पाण्याखाली सडलेले सोयाबीन आणि खरवडून गेलेली जमीन, या भीषण वास्तवाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा हॅशटॅग एक प्रभावी माध्यम बनला आहे.
या मोहिमेद्वारे, केवळ पंचनामे नको, तर संपूर्ण जिल्हा ‘ओला दुष्काळ’ म्हणून जाहीर करून तात्काळ थेट आर्थिक मदत द्या, ही प्रमुख मागणी जोर धरत आहे. सोशल मीडियावरील हा वाढता दबाव पाहता, शासन आता या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निपाणी. माळेवाडी. पखरुड. ईट. भुम .परांडा. वाशी . शेतकरी पावसाने वैतागून गेले आहे जनावरे वाहुन गेले गोठ्यात मेले सर्व काही उध्वस्त झाले आहे तरी शासनाने तातडीने मदत करावी


