• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देश व मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रियेला डिजिटल बळ. पारदर्शक पोलीस भरतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.

Nadim Inamdar by Nadim Inamdar
February 14, 2026
in Blog
0
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देश व मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रियेला डिजिटल बळ. पारदर्शक पोलीस भरतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

लातूर प्रतिनिधी-

पोलीस अधीक्षक कार्यालय,लातूर. लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक, निष्पक्ष व गुणवत्ताधारित पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देश व मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस यांच्या धोरणानुसार डिजिटल प्रणालीचा अवलंब करून भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा नवा आदर्श निर्माण करण्यात आला आहे.

RelatedPosts

“बेस्ट” उपक्रमातील कार्यरत,सेवानिवृत्त, आणि खाजगी कंत्राटदार (वेट लीज)कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मा.मुख्यमंत्री यांना निवेदन सादर.

​छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई; गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

बायोमेट्रिक प्रणाली चा वापर उमेदवारांची अचूक पडताळणी भरती प्रक्रियेच्या प्रारंभी प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रिक नोंदणी (फिंगरप्रिंट रेकग्निशन) करण्यात येते. मैदानी चाचणीवेळी नोंदवलेली बायोमेट्रिक माहितीलेखी परीक्षेदरम्यान पुन्हा पडताळली जाते यामुळे मैदानी चाचणी देणारा उमेदवार आणि लेखी परीक्षेला उपस्थित राहणारा उमेदवार तोच असल्याची खात्री संगणकीय पद्धतीने केली जाते त्यामुळे गैर प्रकारांना पूर्णतः आळा बसणार आहे.

🔹RFID (Radio Frequency Identification) चिप प्रणाली. धावण्याच्या चाचणीत शंभर टक्के अचूकता आणण्यासाठी मैदानी धाव चाचणीदरम्यान प्रत्येक उमेदवाराच्या पायाला RFID चिप स्ट्रॅपद्वारे सुरक्षितपणे बांधली जाते. सदर RFID चिप मुळे अचूक वेळ नोंद. धाव चाचणी सुरू होताच सेन्सर प्रणालीद्वारे उमेदवाराने पूर्ण केलेल्या अंतराची सेकंदागणिक डिजिटल नोंद होते. मानवी हस्तक्षेप टाळल्यामुळे वेळ मोजण्यात कोणतीही चूक राहत नाही. फेऱ्यांची स्वयंचलित मोजणी. लांब पल्ल्याच्या धावण्यात प्रत्येक फेरीची नोंद स्वयंचलितपणे केली जाते.✔ फसवणूक प्रतिबंध. प्रत्येक RFID चिप उमेदवाराच्या विशिष्ट नोंदणी क्रमांकाशी जोडलेली असल्याने गैर प्रकारांना पूर्णतः आळा बसतो.

🔹सीसीटीव्ही व डिजिटल नियंत्रण कक्ष. भरती प्रक्रियेच्या संपूर्ण परिसरात उच्च क्षमतेचे CCTV कॅमेरे बसविण्यात आले असून, नियंत्रण कक्षातून थेट निरीक्षण केले जाते.प्रत्येक टप्प्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगपारदर्शकतेसाठी ठोस पुरावा उपलब्ध आहे. यामुळे प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व शंकामुक्त बनली आहे.

🔹संगणकीकृत डेटा व्यवस्थापन व त्वरित निकाल. सर्व उमेदवारांची माहिती, गुणांकन, वेळ नोंदी व निकाल पूर्णतः संगणकीकृत प्रणालीद्वारे हाताळले जातात. त्यामुळे कसल्याही प्रकारची त्रुटीची शक्यता संपवून धाव चाचणी पूर्ण होताच वेळेची त्वरित माहिती उपलब्ध होते. पारदर्शकतेचा दृढ संकल्प. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व गुणवत्ताधारित बनवली आहे. बायोमेट्रिक ओळख प्रणाली, RFID तंत्रज्ञान, CCTV मॉनिटरिंग व संगणकीकृत डेटा व्यवस्थापन या सर्व उपाययोजनांमुळे भरती प्रक्रियेत गैरप्रकारांना पूर्णपणे आळा बसला असून लातूर पोलीस दलाची ही तंत्रज्ञानाधारित भरती प्रक्रिया भविष्यातील प्रशासनासाठी आदर्श ठरत आहे.

Previous Post

🟢 राजकारण संपले, आता समाजकारण : हुडे ता. आजरा,गावचा विकासोन्मुख आदर्श!

Next Post

SRK Taekwondo Instituteच्या स्वरा साखळकरची दमदार कामगिरी१९ वी रत्नागिरी जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत २ सुवर्ण व १ कांस्यपदकाची कमाई

Related Posts

“बेस्ट” उपक्रमातील कार्यरत,सेवानिवृत्त, आणि खाजगी कंत्राटदार (वेट लीज)कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मा.मुख्यमंत्री यांना निवेदन सादर.
Blog

“बेस्ट” उपक्रमातील कार्यरत,सेवानिवृत्त, आणि खाजगी कंत्राटदार (वेट लीज)कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मा.मुख्यमंत्री यांना निवेदन सादर.

March 18, 2026
7
Blog

​छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा

March 18, 2026
1
Blog

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई; गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

March 18, 2026
29
Blog

पोलिसांना थेट भिडण्याचे आव्हान देणारा कुख्यात गुंड अखेर चकमकीत ठार; एका एसटीएफ जवानाला वीरमरण बिहार राज्यातील मोतीहारी जिल्ह्यात एक अतिशय थरारक आणि धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलिसांना थेट फोन करून उघडपणे धमक्या देणाऱ्या आणि चकमकीचे आव्हान देणाऱ्या कुंदन ठाकूर या कुख्यात गुंडाचा पोलिसांसोबत झालेल्या एका जोरदार चकमकीत मृत्यू झाला आहे. या अत्यंत तणावपूर्ण कारवाईदरम्यान एसटीएफ च्या एका जवानाला आपले प्राण गमवावे लागले असून, या गुन्हेगारासोबत असलेले आणखी दोन गुन्हेगार देखील या कारवाईत मारले गेले आहेत.या घटनेच्या केवळ दोन दिवस आधीचा एक ऑडिओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कुंदन ठाकूर अतिशय निर्भयपणे पोलीस अधिकाऱ्यांना धमकावताना ऐकू येत होता. त्याने थेट पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना फोन करून आव्हान दिले होते की, “चकमकीची वेळ आणि ठिकाण तुम्हीच ठरवा, मी तिथे आधीपासूनच उपस्थित असेन. या प्रयत्नात १० ते १५ पोलिसांना आपले प्राण गमवावे लागतील, मात्र तरीही तुम्ही मला पकडू शकणार नाही.” अशा स्पष्ट शब्दांत त्याने प्रशासनाला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला होता.याच संभाषणात त्याने पोलिसांवर आपल्या कुटुंबीयांना नाहक त्रास देत असल्याचा आरोपही केला होता. “जर तुम्ही माझ्या कुटुंबाला त्रास दिलात, तर मीदेखील तुमच्या कुटुंबांना सोडणार नाही,” अशी थेट धमकी त्याने दिली होती. विशेष म्हणजे, त्याच्या आवाजात पोलिसांबद्दल कोणतीही भीती किंवा आदर जाणवत नव्हता. जेव्हा पोलिसांनी त्याला “तू धमकी देतोय का?” असे विचारले, तेव्हा “ही धमकी नसून माझा सल्ला आहे,” असे उद्धट उत्तर त्याने दिले होते. तसेच, वेळ आल्यास आपण पळ काढणार नाही, तर पोलिसांशी समोरासमोर दोन हात करू, असेही त्याने वारंवार स्पष्ट केले होते.हा गुन्हेगार गेल्या बऱ्याच कालावधीपासून पोलिसांच्या रडारवर होता. त्याच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात होते. अखेर पोलिसांना त्याच्या अचूक ठावठिकाण्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री उशिरा नाकेबंदी केली. पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी पोहोचताच, तिथे दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या अनपेक्षित आणि अचानक झालेल्या हल्ल्यात एसटीएफचा एक जवान गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या अनपेक्षित हल्ल्याला प्रत्युत्तर देताना आणि स्वतःच्या बचावासाठी पोलिसांनीही तातडीने गोळीबार सुरू केला. या कारवाईत मुख्य आरोपी कुंदन ठाकूर याच्यासह इतर दोन गुन्हेगार जागीच ठार झाले. या संपूर्ण चकमकीच्या काळात परिसरात सातत्याने गोळीबाराचे मोठे आवाज घुमत होते. अनेक दिवसांपासून पोलिसांना आव्हान देणाऱ्या आणि त्यांना लक्ष्य करू पाहणाऱ्या या गुन्हेगाराचा अखेर या थरारक कारवाईत शेवट झाला आहे.पत्रकाराचे मत:कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच जेव्हा गुन्हेगारांकडून थेट धमक्या दिल्या जातात, तेव्हा समाजाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. या चकमकीत एका कर्तव्यदक्ष जवानाला वीरमरण आले, ही बाब अत्यंत क्लेशदायक आहे. कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी अशा गुन्हेगारांवर कठोर आणि जलद कारवाई होणे ही काळाची गरज बनली आहे.

March 18, 2026
5
Blog

बारामतीला निसर्गाचा तडाखा; बाबुर्डी परिसरात गारांचा जोरदार पाऊस

March 18, 2026
50
Blog

अखेर पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड जाहीर

March 18, 2026
5
Next Post
SRK Taekwondo Instituteच्या स्वरा साखळकरची दमदार कामगिरी१९ वी रत्नागिरी जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत २ सुवर्ण व १ कांस्यपदकाची कमाई

SRK Taekwondo Instituteच्या स्वरा साखळकरची दमदार कामगिरी१९ वी रत्नागिरी जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत २ सुवर्ण व १ कांस्यपदकाची कमाई

ताज्या बातम्या

“मी स्वावलंबी उद्योगिनी मी” या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

“मी स्वावलंबी उद्योगिनी मी” या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

March 18, 2026
वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

March 18, 2026
“बेस्ट” उपक्रमातील कार्यरत,सेवानिवृत्त, आणि खाजगी कंत्राटदार (वेट लीज)कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मा.मुख्यमंत्री यांना निवेदन सादर.

“बेस्ट” उपक्रमातील कार्यरत,सेवानिवृत्त, आणि खाजगी कंत्राटदार (वेट लीज)कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मा.मुख्यमंत्री यांना निवेदन सादर.

March 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In