नितेश गट्टीवार चामोर्शी(गडचिरोली) :दि.१६ भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही जनतेच्या जीवनाधार योजना असताना, भाजप सरकारने ती मोडीत काढून तिच्या जागी VB RAM G ही नवी योजना लादण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील कोट्यवधी कष्टकरी नागरिकांचा रोजगार हिरावला जाणार असून ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.या लोकविरोधी, शेतकरी-मजूर विरोधी निर्णयाचा तीव्र निषेध करण्यासाठी तसेच मनरेगा योजना जुन्याच पद्धतीने, केंद्र सरकारच्या १०० टक्के अनुदानासह तात्काळ सुरू करण्यात यावी या ठोस मागणीसाठी “मनरेगा बचाव संग्राम” अभियानांतर्गत आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आरमोरी येथे मनरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामावर उतरून भाजप सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.

यावेळी तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, आरमोरी शहराध्यक्ष शालिक पत्रे, उपाध्यक्ष दिलीप घोडाम,लता ढोकरे, अक्षय बागडे, मेघा मणे, माणिकजी भोयर, प्रज्ञा निमगडे, आशिष सहारे, भजनराव उसेंडी, चंद्रशेखर टेंभुर्णे, विश्वेश्वर दररो, निकेश ताडाम, दीपक घुबडे, ईश्वर बरखडे, नीलकंठ गोहने, संदीप राऊत, बावनकर, मुन्नासिंग चंदेल, आशिष लोणारे, अमर उपरीकर, विशाल मंडलवार, रोशन लक्षणे, प्रज्वल नैताम, आकाश लोथे, प्रफुल नासवरे, भूषण चिचघरे, दीपक मडावी, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मनरेगा योजनेत काम करणारे कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले की, मनरेगा ही केवळ रोजगार योजना नसून ग्रामीण भारताचा जीवनाधार आहे. भाजप सरकारचा हा निर्णय गरीबविरोधी असून काँग्रेस पक्ष जनतेच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करीत राहील.








