फलटण :
विवाहासाठी योग्य स्थळ शोधताना अनेक कुटुंबांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ‘जनहित सर्वसमाज वधू-वर सूचक केंद्र, महाराष्ट्र राज्य’ या उपक्रमाची सुरुवात सन २०२२ पासून करण्यात आली आहे. जाती-धर्म, आर्थिक स्तर किंवा सामाजिक भेदभाव न करता सर्व समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींना योग्य स्थळ उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा प्रमुख उद्देश आहे.
या केंद्राच्या माध्यमातून विवाह इच्छुकांची नोंदणी, स्थळांची माहिती, समुपदेशन तसेच विवाह जुळविण्याची पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती केंद्राचे संचालक निखिल नाळे यांनी दिली. समाजातील युवक-युवतींचे विवाह वेळेत व्हावेत तसेच विश्वासार्ह आणि सुरक्षित व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
समाजोपयोगी दृष्टीकोनातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक कुटुंबांना योग्य स्थळ शोधण्यात मदत होत आहे.
विवाहासाठी इच्छुक युवक-युवती तसेच पालकांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क :
जनहित सर्वसमाज वधू-वर सूचक केंद्र, महाराष्ट्र राज्य
फलटण, ता. फलटण, जि. सातारा
संचालक : निखिल नाळे
मो. : 7057982146
