• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

लोहारा प्रतिनिधी

मौजे नागूर, ता. लोहारा, जि. धाराशिव येथे मागील काही महिन्यांपासून येणाऱ्या एस.टी. बसच्या अनियमित आणि ढिसाळ नियोजनामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही उमरगा आणि लोहारा येथील राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

RelatedPosts

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षक म्हणून सतीश मोरे यांचा गौरव

एस.टी. बस वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात वेळेत पोहोचणे कठीण होत आहे. परीक्षांना उशीर होणे, वर्ग चुकणे तसेच शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर याचा गंभीर परिणाम होत आहे.

ज्येष्ठ पत्रकार कै. के. वाय. जाधव (आण्णा) यांच्या प्रयत्नांमुळे पूर्वी नागूर गावासाठी एस.टी. बसचे वेळापत्रक अत्यंत शिस्तबद्ध होते. बस वेळेवर येत-जात असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळत होता. मात्र त्यांच्या निधनानंतर नागूर गावातील एस.टी. सेवेचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

या अनियमिततेमुळे ग्रामस्थांना शैक्षणिक, आर्थिक तसेच वैद्यकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई राज्य परिवहन महामंडळ करणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

राज्य परिवहन महामंडळाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी ९ वाजता, सकाळी ११ वाजता, दुपारी ३ वाजता, सायंकाळी ४ वाजता आणि रात्री ८ वाजता नागूर गावात एस.टी. बस येणे अपेक्षित आहे. मात्र विशेषतः रात्री मुक्कामी येणारी बस ही नियोजित वेळेपेक्षा तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिराने येत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून एस.टी. बसचे नियोजन सुरळीत करावे, तसेच सर्व बसगाड्या वेळापत्रकानुसार चालवाव्यात अशी मागणी केली आहे. अन्यथा नागूरसह परिसरातील नागरिक मोठे जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Tags: Aditya Jadhav
Previous Post

मराठा गौरव आदरणीय श्री. युवराज (भाऊ) काशिद यांच्या हस्ते सारोळा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Next Post

खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Related Posts

ताज्या घडामोडी

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

July 6, 2026
7
ताज्या घडामोडी

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षक म्हणून सतीश मोरे यांचा गौरव

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

पंढरपुरात पोलीस पाटील संघटनेची सुनेत्रा अजित पवार यांची भेट; प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा

July 6, 2026
18
ताज्या घडामोडी

सावरगावच्या सरपंच राधा पिसाळ यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

July 6, 2026
11
ताज्या घडामोडी

निंभोरा सिम ते विटवा मार्गावरील भुई नदी पूल धोकादायक; पूल व रस्ता वाहतुकीसाठी बंद

July 6, 2026
12
Next Post

खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; पुणे शहर व ग्रामीण भागातील सर्व शाळांना सोमवार, ६ जुलै रोजी सुट्टी..!

July 6, 2026

पारगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र गावठाण सुशोभीकरण कामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न…!

July 6, 2026

पुण्यातील चाकण परिसर जलमय; रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिक त्रस्त

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In