• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गारगोटी येथे ग्रंथ महोत्सवात कवी संमेलन उत्साहात; साहित्यिकांनी ‘पाचवा स्तंभ’ म्हणून पुढे यावे – डॉ. चंद्रशेखर कांबळे

by
February 20, 2026
in Blog
0
गारगोटी येथे ग्रंथ महोत्सवात कवी संमेलन उत्साहात; साहित्यिकांनी ‘पाचवा स्तंभ’ म्हणून पुढे यावे – डॉ. चंद्रशेखर कांबळे
0
SHARES
161
VIEWS
Ad 1

गारगोटी (प्रतिनिधी) – “काय बोलावे, काय लिहावे आणि काय मांडावे हेही आता आपल्या हातात राहिलेले नाही. व्यवस्थेविरोधात बोलणे अक्षम्य गुन्हा ठरत असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने येत आहेत. अशा वेळी लोकशाहीच्या रक्षणासाठी साहित्यिकांनीच ‘पाचवा स्तंभ’ म्हणून पुढे आले पाहिजे,” अशी ठाम भूमिका कवी डॉ. चंद्रशेखर कांबळे यांनी मांडली.

गारगोटी येथे जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ग्रंथ महोत्सवातील कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

RelatedPosts

खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

मराठा गौरव आदरणीय श्री. युवराज (भाऊ) काशिद यांच्या हस्ते सारोळा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

फलटण येथे ‘जनहित सर्वसमाज वधू-वर सूचक केंद्र’च्या माध्यमातून समाजसेवेचा उपक्रम

डॉ. कांबळे पुढे म्हणाले, “चांगल्या वाचनातून लेखकाला आत्मशोध घेता येतो. आत्मशोध हा कवितेजवळ जाण्याचा सक्षम मार्ग आहे. सकस वाचनातून दर्जेदार साहित्य निर्मिती होते. सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक वातावरणात तसेच समूहमनातील अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर वंचित, शोषितांच्या वेदना व मानवमुक्तीचा आवाज साहित्यातून उमटणे आवश्यक आहे.”

लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात येत असताना लिहिणाऱ्या हातांनीच ‘पाचवा स्तंभ’ म्हणून पुढे येणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी गावाचे तुटलेपण, शेतकरी बापाची अवस्था, पावसाची अनिश्चितता तसेच वर्तमानातील राजकीय व सामाजिक प्रदूषण यांसारख्या विषयांवर कवी राजन कोनवडेकर, रवींद्र कामत, मंदार पाटील, विद्या खामकर, विनायक चौगले, मायकल डिसोजा व पी. एस. कांबळे यांनी आपल्या कवितांमधून प्रभावी मांडणी केली.

विशेषतः कवी विद्या खामकर यांच्या कविता व चारोळी सादरीकरणास रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले. विक्रम वागरे यांच्या निवेदनामुळे संमेलनात रंगत आली. जिल्हाभरातून शेकडो ग्रंथप्रेमी या कवी संमेलनास उपस्थित होते.

ग्रंथ महोत्सवातील हे कवी संमेलन साहित्यप्रेमींसाठी विचारप्रवर्तक ठरले.

Previous Post

अनधिकृत खोक्यांवर महापालिकेचा हातोडा’; अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या खोक्यांवर महापालिकेने चालवला जेसीबी

Next Post

सावली गावातील pvc पाईप लाईन नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे ठेकेदारावर कार्यवाही करा आमदार राजेश बकाणे यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी

Related Posts

Blog

खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

July 6, 2026
1
Blog

मराठा गौरव आदरणीय श्री. युवराज (भाऊ) काशिद यांच्या हस्ते सारोळा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

July 6, 2026
5
Blog

फलटण येथे ‘जनहित सर्वसमाज वधू-वर सूचक केंद्र’च्या माध्यमातून समाजसेवेचा उपक्रम

July 6, 2026
5
Blog

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; सोमवार, ६ जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी

July 6, 2026
0
Blog

श्रीरामपूरात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण; प्रशासनाकडून घरोघरी सर्वेक्षण मोहीम सुरू

July 6, 2026
3
Blog

शित्तूर वारूण येथे सशस्त्र दरोडेखोरांचा धाडसी दरोडा; आई-मुलाला बेदम मारहाण करत ७९ हजारांचा ऐवज लंपास

July 6, 2026
5
Next Post
सावली गावातील pvc पाईप लाईन नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे ठेकेदारावर कार्यवाही करा आमदार राजेश बकाणे यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी

सावली गावातील pvc पाईप लाईन नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे ठेकेदारावर कार्यवाही करा आमदार राजेश बकाणे यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी

ताज्या बातम्या

खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

July 6, 2026

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026

मराठा गौरव आदरणीय श्री. युवराज (भाऊ) काशिद यांच्या हस्ते सारोळा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In