नितेश गट्टीवार चामोर्शी (गडचिरोली)दि.१७ तालुक्यातील भेंडाळा परिसरात सुरु असलेल्या एमआयडीसी हालचाली ला सक्त विरोध शेतकऱ्यांकडुन होत असुन शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायविरुद्ध वाचा फोडण्याच्या मागणीचे निवेदन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा.नामदेव किरसान यांना देण्यात आले.
१४ गांवाना औद्योगिक क्षेत्र म्हणुन घोषीत केल्याने एमआयडिसी रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी बचाव जनआंदोलन समितीने निवेदन देतांना शेतकरी बचाव जन आंदोलन समिती भेंडाळा परीसर अध्यक्ष मनोज पोरटे, उपाध्यक्ष सुधिर शिवणकर, काँग्रेस पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, काँग्रेस मिडीया प्रमुख विजय लाड, वेलतुर ( तुकुम ) उपसरपंच दिगांबर धानोरकर, कळमगाव गट माजी सरपंच रवी धोटे, चाकलपेठ माजी उपसरपंच विकास रायसिडाम, यशवंत त्रिकांडे यासह शेतकरी उपस्थित होते,





