
नितेश गट्टीवार चामोर्शी(गडचिरोली):दि.७ मार्च अर्थसंकल्प २०२६ हा राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत घेतलेले निर्णय ग्रामीण भागातील विकासाला नवी दिशा देणारे असून अर्थसंकल्पामध्ये पीक कर्जमाफीसाठी जाहीर करण्यात आलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारे प्रोत्साहन पर लाभ तसेच शेतमजुरांचा विविध योजनांमध्ये करण्यात आलेला समावेश हे अत्यंत स्वागतार्थ पाऊल असल्याचे मत चामोर्शी नगरपंचायत च्या महिला व बालकल्याण सभापती तथा भाजपा तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे यांनी व्यक्त केले आहे







