कुरुंदवाड मध्ये उन्हाळ्यात शीतपेयांच्या दुकानात नागरिकांची प्रचंड गर्दी….
प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.
कुरुंदवाड :-या शहरात उन्हाचे प्रचंड चटके बसत असून आजचे तापमान 38 अंश डिग्री सेलशियस असून दुपारी 2 वाजता सूर्य तळपत आहे. त्यामुळे उन्हाळ्याचा कहर वाढत जाईल तस – तसे रस्तो- रस्ती आणि गल्लीबोळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शीतपेयांचा बाजार भरभराटीला आलेला दिसत आहे. मात्र रस्त्यावर आणि अनेक वेळा काही शीतपेय स्टॉलमधून मिळणाऱ्या अतिथंडगार शीतपेयामुळे ग्राहकांना क्षणभर थंडावा देणारा असला तरी त्यांच्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळण्याचा धोका आहे.
उन्हाळ्यामुळे शहरात सध्या सर्वत्र लिंबू सरबताचे गाडे आढळून येऊ लागले आहेत. तर सर्वत्र कोकमचा बोलबाला होताना दिसत आहे. तर कैरीचे पेय अनेक वेळा रासायनिक पदार्थाच्या वापरातून बनवले जाताना दिसत आहे. कृत्रिम शीतपेयामध्ये जे पदार्थ रंग आणि रसायन वापरले जातात त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेगवेगळ्या आजार होण्याचा धोका असतो. दुग्धजन्य पदार्थाचे शीतपेयामध्ये वासासाठी अँजिनोमोटो वेगवेगळी रसायने वापरली जातात जी मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत.
तापमानाचा पारायण 38 – 39 अंश सेल्सिअस कायम असल्याने उन्हाच्या तप्त झळांनी कुरुंदवाडकर घामेघुम झाले आहेत. उष्णतेची लाट यावी अशा झळांनी अंग भाजून निघत आहे. फेब्रुवारी संपल्यानंतर गेल्या आठवड्यापासून शिरोळ तालुक्यात उखाड्याने कहर केला आहे. पाच मिनिटे जरी बाहेर गेले अथवा घर, कार्यालयात फॅन शिवाय राहिले तरी अंग घामाने भिजत आहे.
आठवडाभरापासून पारा 38 – 39 अंशावर कायम राहिला आहे. कमाल तापमान वाढत असतानाच किमान तापमानात ही वाढ होत असल्याने नागरिकांची रात्रीची झोपही उडविली आहे. या तापमाना पासून सुटकेसाठी नागरिकातून कलिंगड, ऊसाचा रस, सरबत, मसाले ताक, मठा, लसी यांची मागणी वाढू लागली आहे.
त्यामुळे मनाला गारवा, शीतलता लाभण्यासाठी सध्या शीतपेयच्या दुकानात प्रचंड गर्दी वाढत आहे.










