
परभणी
मेहनत आणि जिद्द असेल तर परिस्थितीवर मात करत यशाची शिखरे कशी गाठता येतात, याचे उत्तम उदाहरण खानापूर येथील अलंकार शिवाजीराव जाधव यांनी घालून दिले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवित यश मिळवत अलंकार यांची ‘पोलिस उपनिरीक्षक’ (PSI) पदी निवड झाली आहे.शेतकऱ्याच्या घरातले यशअलंकार यांचे वडील शिवाजीराव जाधव आणि आई हे दोघेही शेतकरी आहेत. अत्यंत हालाखीची परिस्थिती आणि शेतीवर अवलंबून असलेले कुटुंब असूनही, अलंकार यांनी आपल्या ध्येयापासून कधीही माघार घेतली नाही. शेतात राबणाऱ्या पालकांचा संघर्ष पाहून त्यांनी लहाणपणापासूनच काहीतरी मोठे करून दाखवण्याचा निर्धार केला होता
पालकांचा उर अभिमानाने भरलाआपल्या मुलाच्या निवडीबद्दल बोलताना वडील शिवाजीराव जाधव भावूक झाले. ते म्हणाले, “आम्ही कष्टाचे काम करून मुलाला शिकवले. त्याने आमच्या कष्टाचे चीज केले आहे. आज आमच्या मुलाचे नाव सरकारी दफ्तरी पोलिस उपनिरीक्षक म्हणून झळकताना पाहून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.”अलंकार जाधव यांच्या या यशाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाने ग्रामीण भागातील अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे.









