सारथी महाराष्ट्राचा, प्रतिनिधी:
चांदुर रेल्वे शहरातील स्वच्छतेच्या समस्या नागरिकांसमोर गंभीरपणे उभ्या राहिल्या आहेत. प्रभाग क्रमांक ६, भगवंत चौक परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, परिसरात वारंवार अस्वच्छतेचा सामना करावा लागत असून नाल्या आणि रस्त्यावर सांडपाणी व कचरा नियमित साफ होत नाही.
नागरिकांनी नगरपरिषदेकडे अनेक तक्रारी केल्या असूनही नगरपरिषदेचे दुर्लक्ष केल्याची भावना व्यक्त केली आहे. नाल्यांमध्ये जमा झालेला कचरा पाण्याचा प्रवाह थांबवतो, ज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परिस्थिती गांभीर्याची असून स्थानिक प्रशासनाने तातडीने नाली व रस्त्यांची सफाई नियमित करण्याचे उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
या प्रश्नाकडे लक्ष दिल्यासच शहरातील नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











