सारथी महाराष्ट्राचा न्यूज प्रतिनिधी अंकुश धामणकर
ता/१०/०३/२०२६
चांदुर रेल्वे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रभाग क्रमांक ६ भगवंत चौक परिसरातील नागरिकांना वारंवार अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे,
परिसरातील नाल्या रस्त्यावरचे सांडपाणी कचरा नियमितपणे साफ करण्यात येत नसल्याचे नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगत असल्याचे समजते.
वारंवार नगर परिषद कार्यालयाकडे तक्रारी करून सुद्धा नगर परिषदेचे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
नालीचे सफाई नियमितपणे करण्यात येत नसल्याने नालीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा अडकलेला असल्याने नालीचे पाणी वाहत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक प्रशासने गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांच्या समस्येकडे तातडीने लक्ष लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.



