प्रतिनिधी : ईश्वरपूर
आजच्या पदवी अभ्यासक्रमानुसार समाजशास्त्र विषयाच्या आधारे करिअरच्या त्याचबरोबर समाजसेवेच्या विविध संधी व सेवा उपलब्ध आहेत. असे प्रतिपादन प्रा.बी.एम. शेळके सर यांनी केले.
मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या अग्रणी महाविद्यालयांतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर होते.
प्रा. बी. एम शेळके पुढे बोलताना म्हणाले की, विद्यार्थिनींनी करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणारे शास्त्र म्हणून समाजशास्त्राला पाहिले पाहिजे. त्यानुसार पदवी अभ्यासक्रमानंतर नोकरी किंवा व्यवसाय करता येईल अशा विविध कोर्स किंवा उच्च पदवी शिक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर समाजशास्त्र विषयाच्या पदवी अभ्यासक्रमातून अर्थाजनाबरोबर समाज बांधिलकीचे कार्य जोपासणे हे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी विविध कोर्सेस देखील समाजशास्त्राशी संबंधित आहेत. त्या विविध कोर्सेस विषयी सखोल मार्गदर्शन व्याख्यानामध्ये पीपीटी मांडणीच्या साह्याने करण्यात आले.
आजच्या स्पर्धेच्या युगात समाजशास्त्र विषयाचा आधार घेऊन अनेक प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असणारे अधिकारी यांचे देखील उदाहरण यावेळी देण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ.अंकुश बेलवटकर सर म्हणाले की, सर्व विषयाबरोबरच समाजशास्त्र विषयांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. चांगले करिअर घडवण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही त्यासाठी विद्यार्थिनींनी प्रयत्न करावेत.
या कार्यक्रम प्रसंगी डॉ.रत्नाकर, डॉ. व्ही. वाय .पाटील, डॉ. एम.एस पाटील, डॉ. एम. व्ही. पाटील, प्रा. खामकर सर, प्रा. के. बी पाटील सर, डॉ. मरळे सर, प्रा. डामसे सर, डॉ. घुले सर, डॉ.विजय माळी, प्रा. अजय आयरेकर, प्रा.शैलजा पाटील, डॉ.अमृता निलाखे व सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक समाजशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ. रंजना पवार यांनी करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. असे कार्यक्रम महाविद्यालयातील विद्यार्थिनींना किती दिशादर्शक आहेत याबाबत त्यांनी विवेचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले. तर आभार प्रा. प्रसाद जाधव यांनी मानले.



