• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई; गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

by
March 18, 2026
in Blog
0
0
SHARES
75
VIEWS
Ad 1

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई; गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

संपादक – रोहित जगताप, सारथी महाराष्ट्राचा

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

बारामती : आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि टंचाईचे संकट निर्माण झाले असतानाच, बारामती तालुक्यातील बाबुर्डी व परिसरात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहेत.

इंधन दरवाढीमुळे शेतीचा खर्च आधीच वाढलेला आहे. मशागत, पेरणी, फवारणी आणि मालाची वाहतूक यासाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत.

त्यातच अचानक आलेल्या गारपिटीमुळे गहू, हरभरा, भाजीपाला तसेच द्राक्ष आणि डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे.या दुहेरी फटक्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कडक उन्हामुळे त्रस्त नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरत आहे.

दरम्यान, नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, तसेच इंधन दरांवर नियंत्रण ठेवून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Previous Post

पोलिसांना थेट भिडण्याचे आव्हान देणारा कुख्यात गुंड अखेर चकमकीत ठार; एका एसटीएफ जवानाला वीरमरण बिहार राज्यातील मोतीहारी जिल्ह्यात एक अतिशय थरारक आणि धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलिसांना थेट फोन करून उघडपणे धमक्या देणाऱ्या आणि चकमकीचे आव्हान देणाऱ्या कुंदन ठाकूर या कुख्यात गुंडाचा पोलिसांसोबत झालेल्या एका जोरदार चकमकीत मृत्यू झाला आहे. या अत्यंत तणावपूर्ण कारवाईदरम्यान एसटीएफ च्या एका जवानाला आपले प्राण गमवावे लागले असून, या गुन्हेगारासोबत असलेले आणखी दोन गुन्हेगार देखील या कारवाईत मारले गेले आहेत.या घटनेच्या केवळ दोन दिवस आधीचा एक ऑडिओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कुंदन ठाकूर अतिशय निर्भयपणे पोलीस अधिकाऱ्यांना धमकावताना ऐकू येत होता. त्याने थेट पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना फोन करून आव्हान दिले होते की, “चकमकीची वेळ आणि ठिकाण तुम्हीच ठरवा, मी तिथे आधीपासूनच उपस्थित असेन. या प्रयत्नात १० ते १५ पोलिसांना आपले प्राण गमवावे लागतील, मात्र तरीही तुम्ही मला पकडू शकणार नाही.” अशा स्पष्ट शब्दांत त्याने प्रशासनाला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला होता.याच संभाषणात त्याने पोलिसांवर आपल्या कुटुंबीयांना नाहक त्रास देत असल्याचा आरोपही केला होता. “जर तुम्ही माझ्या कुटुंबाला त्रास दिलात, तर मीदेखील तुमच्या कुटुंबांना सोडणार नाही,” अशी थेट धमकी त्याने दिली होती. विशेष म्हणजे, त्याच्या आवाजात पोलिसांबद्दल कोणतीही भीती किंवा आदर जाणवत नव्हता. जेव्हा पोलिसांनी त्याला “तू धमकी देतोय का?” असे विचारले, तेव्हा “ही धमकी नसून माझा सल्ला आहे,” असे उद्धट उत्तर त्याने दिले होते. तसेच, वेळ आल्यास आपण पळ काढणार नाही, तर पोलिसांशी समोरासमोर दोन हात करू, असेही त्याने वारंवार स्पष्ट केले होते.हा गुन्हेगार गेल्या बऱ्याच कालावधीपासून पोलिसांच्या रडारवर होता. त्याच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात होते. अखेर पोलिसांना त्याच्या अचूक ठावठिकाण्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री उशिरा नाकेबंदी केली. पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी पोहोचताच, तिथे दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या अनपेक्षित आणि अचानक झालेल्या हल्ल्यात एसटीएफचा एक जवान गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या अनपेक्षित हल्ल्याला प्रत्युत्तर देताना आणि स्वतःच्या बचावासाठी पोलिसांनीही तातडीने गोळीबार सुरू केला. या कारवाईत मुख्य आरोपी कुंदन ठाकूर याच्यासह इतर दोन गुन्हेगार जागीच ठार झाले. या संपूर्ण चकमकीच्या काळात परिसरात सातत्याने गोळीबाराचे मोठे आवाज घुमत होते. अनेक दिवसांपासून पोलिसांना आव्हान देणाऱ्या आणि त्यांना लक्ष्य करू पाहणाऱ्या या गुन्हेगाराचा अखेर या थरारक कारवाईत शेवट झाला आहे.पत्रकाराचे मत:कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच जेव्हा गुन्हेगारांकडून थेट धमक्या दिल्या जातात, तेव्हा समाजाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. या चकमकीत एका कर्तव्यदक्ष जवानाला वीरमरण आले, ही बाब अत्यंत क्लेशदायक आहे. कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी अशा गुन्हेगारांवर कठोर आणि जलद कारवाई होणे ही काळाची गरज बनली आहे.

Next Post

​छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
1
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
1
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
1
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
1
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post

​छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In