श्रीगोंदा (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी आपले सर्व प्रकारचे कर्ज फेडावे, असे आवाहन सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन Rajendra Nagwade यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत दीर्घ मुदत, अल्प मुदत, मध्यम मुदत तसेच पशुपालन कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा थेट लाभ देण्यात येणार आहे.
मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत आपले कर्ज पूर्णतः फेडणे आवश्यक आहे. अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ३१ मार्चनंतर कर्जावर १३ टक्क्यांऐवजी १५ टक्के व्याजदर लागू होणार असल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी वेळेत कर्जफेड करून आपले खाते ‘नील’ करावे व शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन Rajendra Nagwade यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.








