बागलाण तालुक्यात पोर्टल बंदमुळे पंचनाम्यात अडचणी:प्रशासनाने तात्काळ संकेतस्थळ सुरू करावे हरि अण्णा जाधव यांची शासनाकडे मागणी
सारथी न्यूजसाठी प्रतिनिधी चेतन बागुल बागलाण
बागलाण तालुक्यावर अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबडले मोडले आहे.पंचनामे करण्याचे काम सुरू असतानाच ऑनलाइन सातबारा उतारा चे संकेतस्थळ बंद पडल्याने नुकसान भरपाई व मदतीच्या आशेने धावपळ करणाऱ्या शेतकऱ्यांना सातबारा आणि८-अ उताऱ्यांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने सर्वाधिक नुकसान झालेल्या बागलाण तालुक्यात हा विषय ऐरणीवर आला आहे.
भूमी अभिलेख विभागाचे संकेतस्थळ तांत्रिक बिघाडामुळे वारंवार ठप्प पडत असल्याने संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली आहे संकेतस्थळावरील दुरुस्ती ५ एप्रिल पर्यंत पूर्ण होईल अशी अधिकृत घोषणा असूनही ६ एप्रिल उजाळूनही संकेतस्थळ सुरळीत सुरू झाले नाही महसूल विभागाने २ एप्रिल मध्ये रात्रीपासून ५ एप्रिल पर्यंत संकेतस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता या कालावधीत दुरुस्ती पूर्ण होऊन सेवा पूर्ववतच सुरू होईल अशी अपेक्षा होती मात्र आजही संकेतस्थळावर सर्वर एरर आणि पेज नॉट फाऊंंड ‘ चे संदेश दिसत असल्याने दुरुस्तीचा’ फार्म ‘स झाल्याची भावना व्यक्त होत आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी अडचण सुरू आहे याशिवाय बँक कर्ज न्यायालयीन प्रकरणे आणि जमीन खरेदी विक्रीवर परिणाम होत आहे निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडे प्रशासनाचा तांत्रिक गोंधळ हा दुहेरी संकटात शेतकरी वर्ग सापडला आहे.पंचनाम्यावर परिणाम
महा- ई- सेवा केंद्र आणि सेतू कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांच्या लांब लांब रांगा लागल्या असल्या तरी शेवटी त्यांच्या हाती निराशा येत आहे नुकसान भरपाई साठी सातबारा आणि ८-अ उतारे अत्यावश्यक कागदपत्रे मानली जातात. तलाठी कार्यालयाकडून पंचनामे साठी ही कागदपत्रे तातडीने मागवली जात आहेत परंतु ऑनलाईन सेवा ठप्प असल्याने पंचनाम्याची प्रक्रिया रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्व पीक संपवलं आता सातबारा मिळत नाही म्हणून पंचनाम्याचे कामही अडकल पंचनामे वेळेत झाले नाही तर हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहतील प्रशासनाने तात्काळ संकेतस्थळ सुरू करून पर्यायी व्यवस्था उभी केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरि अण्णा जाधव यांनी दिला.








