• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

तारापूर (जि. पालघर) | प्रतिनिधी :

RelatedPosts

‘स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात जनजागर अभियान; राज्याच्या मागणीला बळ देण्याचा निर्धार

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला पारगावात वेग; नागरिकांनी आधारकार्ड व छायाचित्रासह ग्रामपंचायतीत भेट द्यावी

उर्दू माध्यमातील विद्यार्थिनींसाठी शिरपूर–पातूर मानव विकास बससेवा सुरू करण्याची विधान परिषदेत मागणी; आ. भावना गवळींचा पाठपुरावा

पालघर जिल्ह्यातील तारापूर परिसरातील कुडण गावात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अनिल मोरेश्वर म्हात्रे यांच्या सुमारे दोन एकरांवरील केळी बागेला मोठा फटका बसला असून, १,५०० पैकी सुमारे ८०० केळीची झाडे उन्मळून पडली किंवा गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे सुमारे १.८० ते २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेनंतर सहाय्यक कृषी अधिकारी योगेश साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी ग्रामपंचायतीचे ब वॉर्ड युवा सदस्य राहुल ठाकूर, शेतकरी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. राहुल ठाकूर यांनी शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, पंचनाम्याच्या वेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे काही सदस्य आणि ग्रामसेवक उपस्थित नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

शेतकरी अनिल मोरेश्वर म्हात्रे यांनी शासनाने पंचनामा लवकर मंजूर करून योग्य नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या केळी उत्पादकांना तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सरपंचांची प्रतिक्रिया

दरम्यान, या संदर्भात सरपंच सौ. विजया म्हात्रे यांनी सांगितले की, “मुसळधार पावसामुळे मी पालघर येथे अडकले होते. त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाता आले नाही. मात्र, मी दूरध्वनीद्वारे शेतकऱ्यांशी संपर्क साधला असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल.”

Tags: Kevil Patil
Previous Post

लहुजी नगरातील १९२ झोपडीधारकांच्या पुनर्वसनाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल; तातडीने पर्यायी जागेची मागणी

Next Post

आवास–सासवणे–दिघोडी एसटी सेवा तीन महिन्यांपासून बंद; प्रवाशांचे हाल, बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

‘स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात जनजागर अभियान; राज्याच्या मागणीला बळ देण्याचा निर्धार

July 10, 2026
0
ताज्या घडामोडी

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला पारगावात वेग; नागरिकांनी आधारकार्ड व छायाचित्रासह ग्रामपंचायतीत भेट द्यावी

July 10, 2026
6
ताज्या घडामोडी

उर्दू माध्यमातील विद्यार्थिनींसाठी शिरपूर–पातूर मानव विकास बससेवा सुरू करण्याची विधान परिषदेत मागणी; आ. भावना गवळींचा पाठपुरावा

July 10, 2026
12
ताज्या घडामोडी

मतदार यादी विशेष पुनरीक्षण (SIR) मोहिमेसंदर्भात नेकनूर ग्रामपंचायतीत बीएलओंची आढावा बैठक

July 10, 2026
12
ताज्या घडामोडी

समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिला दिलासा; खरीप हंगामाबाबत आशा पल्लवित, सोयाबीन लागवडीकडे वाढता कल

July 9, 2026
11
ताज्या घडामोडी

१५ दिवसांतच येवला–मनमाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त

July 8, 2026
25
Next Post

आवास–सासवणे–दिघोडी एसटी सेवा तीन महिन्यांपासून बंद; प्रवाशांचे हाल, बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी

ताज्या बातम्या

गेवराई पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; सहा जण ताब्यात, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026

माजी नगरसेवक सय्यद एजाज यांच्या पाठपुराव्याला यश; तय्यब नगरला एसटी बसचा अधिकृत थांबा

July 10, 2026

आवास–सासवणे–दिघोडी एसटी सेवा तीन महिन्यांपासून बंद; प्रवाशांचे हाल, बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी

July 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In