कोकणकर…
मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक महत्त्वाची कामे आजही अपूर्ण अवस्थेत आहेत. सध्याची परिस्थिती पुढीलप्रमाणे आहे:
- नागोठणे – २ ब्रिज अपूर्ण
- कोलाड – १ ब्रिज अपूर्ण
- कोलेटी – अंडरपास अपूर्ण
- खांब – ब्रिज अपूर्ण
- सर्व ब्रिजवरील विद्युत लाईन बंद
- इंदापूर बायपास – अपूर्ण
- माणगाव बायपास – अपूर्ण
- सावित्री नदी उड्डाणपुलाजवळ मोठे खड्डे
- खेड उड्डाणपुल – अपूर्ण
- परशुराम घाट – काम अपूर्ण
- चिपळूण, संगमेश्वर, निवली, हातखंबा, पाली, लांजा – सर्व ब्रिज अपूर्ण
तसेच,
- मिडल ओपनिंग समस्या
- दिशादर्शक फलकांचा अभाव आहे
- वृक्षारोपण झालेले नाही
वरील सर्व गंभीर बाबी लक्षात घेता, नागरिकांना अपूर्ण व धोकादायक रस्त्यावरून प्रवास करावा लागत असूनही टोल वसुली सुरू करणे , ही अत्यंत अन्यायकारक बाब आहे.
1) महामार्गाचे 100% काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करू नये.
2) टोल दर हे 17 वर्षांपूर्वीच्या प्रकल्प खर्चावरच आधारित ठेवावेत.
3) फक्त व्यावसायिक (ट्रान्सपोर्ट) वाहनांकडूनच टोल वसूल करावा.
कोकणी जनतेने एक होणे गरजेचं आहे


