• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विरोधकांकडून शहरवासीयांची दिशाभूल; कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न – नगराध्यक्ष अशोक चराटी यांचा घणाघात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

आजरा नगरपंचायत:
​आजरा | प्रतिनिधी
आजरा नगरपंचायतीमध्ये सध्या सुरू असलेली विकासकामे ही मागील सभागृहातील असून, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून ती मंजूर झाली आहेत. मात्र, विरोधी नगरसेवक केवळ प्रसिद्धीचे ढोंग करून ही कामे आपणच आणल्याचा बनाव रचत आहेत. अशा प्रकारे विरोधक शहरवासीयांची दिशाभूल करत असून कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, असा जोरदार आरोप नगराध्यक्ष अशोक चराटी यांनी पत्रकार परिषदेत केला.
​विरोधकांचा नवा ‘फंडा’ आणि प्रसिद्धीचे ढोंग
​नगराध्यक्ष चराटी यांनी विरोधकांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना सांगितले की, “विरोधकांनी आता एक नवा फंडा शोधला आहे. एखादे विकासकाम सुरू होण्याच्या अगदी काही दिवस आधी आंदोलनाचा इशारा द्यायचा आणि काम सुरू झाले की आपल्या पाठपुराव्यामुळेच हे काम झाले, असा कांगावा करायचा. कोणतीही विकासकामे एका दिवसात मार्गी लागत नसून, त्यासाठी सत्ताधारी आघाडीचे नगराध्यक्ष व नगरसेवक अनेक दिवसांपासून प्रयत्नशील असतात.”

RelatedPosts

अर्धापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पणजी, गोवा येथे राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेत आमदार नमिताताई मुंदडा यांचा सक्रिय सहभाग

सासवड येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मान्यवरांचा सन्मान; विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर


​प्रशासकीय कामात हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांवर अरेरावी
​नगरपंचायतीच्या कारभारात विरोधकांचा हस्तक्षेप वाढत चालल्याचे सांगत चराटी म्हणाले की, “विरोधी मंडळी केवळ दिखावा करण्यासाठी अधिकाऱ्यांवर अरेरावी करत आहेत. यापूर्वी शहरात अधिकारी नव्हते, मात्र मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नांमुळे नगरपंचायतीला अधिकारी मिळाले आहेत. जर विरोधकांच्या अशा वागणुकीमुळे अधिकारी सोडून गेले, तर पुन्हा अधिकारी मिळवणे कठीण होईल. अधिकाऱ्यांवर दादागिरी करण्यापेक्षा नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.”


​विकासाचा ध्यास आणि आबिटकरांचे नेतृत्व
​शहरातील पाणी, रस्ते आणि कचरा यांसारख्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक बऱ्यापैकी करण्यात यश आले आहे. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी गट कटिबद्ध आहे. “नगराध्यक्षांना डावलून विकासकामांचे नारळ फोडण्याची विरोधकांची पद्धत चुकीची आहे. सध्या सुरू असलेली सर्व कामे ही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यामुळेच शक्य झाली असून, त्याचे श्रेय केवळ त्यांनाच जाते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
​समन्वयाचे आवाहन
​मागील सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांनी समन्वयाने काम केले, ज्यामुळे शहराचा विकास झाला. मात्र, आताचे विरोधक केवळ प्रसिद्धीसाठी नगरपंचायतीला आणि पर्यायाने शहराला बदनाम करत आहेत. भांडत बसण्यापेक्षा समन्वयातून शहराचा विकास साधूया, असे आवाहन अशोक चराटी यांनी शेवटी केले.
​या पत्रकार परिषदेला सत्ताधारी आघाडीचे विविध नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

रांजणगाव महागणपती येथे गॅस वितरकांविरोधात तक्रारी, कारवाईची मागणी

Next Post

नागापूर गाव सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत .वान नदीचे खोलीकरण व रस्ते,विविध मागण्याचे निवेदन. परळी तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

Related Posts

अर्धापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
ताज्या घडामोडी

अर्धापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

April 10, 2026
0
पणजी, गोवा येथे राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेत आमदार नमिताताई मुंदडा यांचा सक्रिय सहभाग
ताज्या घडामोडी

पणजी, गोवा येथे राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेत आमदार नमिताताई मुंदडा यांचा सक्रिय सहभाग

April 10, 2026
1
सासवड येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मान्यवरांचा सन्मान; विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर
ताज्या घडामोडी

सासवड येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मान्यवरांचा सन्मान; विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर

April 10, 2026
2
ताज्या घडामोडी

नागापूर गाव सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत .वान नदीचे खोलीकरण व रस्ते,विविध मागण्याचे निवेदन. परळी तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

April 10, 2026
14
ताज्या घडामोडी

रांजणगाव महागणपती येथे गॅस वितरकांविरोधात तक्रारी, कारवाईची मागणी

April 10, 2026
23
ताज्या घडामोडी

मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामे व अन्यायकारक टोल वसुली

April 10, 2026
6
Next Post

नागापूर गाव सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत .वान नदीचे खोलीकरण व रस्ते,विविध मागण्याचे निवेदन. परळी तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

अर्धापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

अर्धापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

April 10, 2026
पणजी, गोवा येथे राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेत आमदार नमिताताई मुंदडा यांचा सक्रिय सहभाग

पणजी, गोवा येथे राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेत आमदार नमिताताई मुंदडा यांचा सक्रिय सहभाग

April 10, 2026
सासवड येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मान्यवरांचा सन्मान; विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर

सासवड येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मान्यवरांचा सन्मान; विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर

April 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In