आजरा: प्रतिनिधी
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सभासद आणि ऊस पुरवठादारांसाठी सवलतीच्या दरात साखर वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हे वाटप दिनांक १६ एप्रिल २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत केले जाणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांनी दिली आहे.
शेअर्सनुसार साखरेचे प्रमाण:
कारखान्याच्या निर्णयानुसार, सभासदांच्या शेअर्स रकमेवर आधारित साखरेचे वाटप खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:
१५,००० रुपये शेअर्स पूर्ण असलेल्यांना: ५० किलो साखर.
१०,००० रुपये शेअर्स जमा असलेल्यांना: २५ किलो साखर.
७,००० रुपये शेअर्स जमा असलेल्यांना: १५ किलो साखर.
ऊस पुरवठादारांसाठी टनेज साखर:
सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा केला आहे, त्यांना प्रति टन अर्धा किलो साखर दिली जाईल. या साखरेचा दर २५ रुपये प्रति किलो असा सवलतीचा राहणार आहे.
साखर वाटप केंद्रे:
स्थानिक सभासद व टनेज साखर: आजरा तालुका खरेदी-विक्री संघाच्या तालुक्यातील संबंधित शाखांमधून वितरण केले जाईल.
गेटकेन पुरवठादार (बाहेरील क्षेत्र): गडहिंग्लज, चंदगड, गारगोटी, आंबोली आणि कर्नाटक सीमा भागातून आलेल्या ऊसाची टनेज साखर थेट कारखाना कार्यस्थळावरून (गेटवरून) दिली जाईल.
महत्त्वाची कागदपत्रे:
साखर घेण्यासाठी पात्र सभासदांनी साखर कार्ड आणणे आवश्यक आहे. तसेच, ऊस पुरवठादारांनी टनेज साखर घेताना आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत (स्व-साक्षांकित/सहीसह) देणे अनिवार्य आहे.
अधुऱ्या शेअर्स रकमेबाबत आवाहन:
ज्या सभासदांची शेअर्स रक्कम अद्याप अपूर्ण आहे, त्यांच्यासाठी साखर वाटप कालावधीतच रक्कम भरण्याची सोय कारखान्याच्या शेती सेंटर ऑफिसमध्ये करण्यात आली आहे. सभासदांनी आपली शेअर्स रक्कम किमान ७,०००, १०,००० किंवा १५,००० पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन उदयसिंह देसाई यांनी केले आहे.
उपस्थित मान्यवर:
या निर्णयावेळी व्हा. चेअरमन अनिल फडके, संचालक वसंतराव धुरे, विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, सुधीर देसाई (जिल्हा बँक प्रतिनिधी), मधुकर देसाई, मारुती घोरपडे, सुभाष देसाई, दीपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, सौ. रचना होलम, सौ. मनीषा देसाई, काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे, तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक एस. के. सावंत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

