मोहजाबंदी लोणी जंगलतोडीमुळे करवंद, जांभूळ झाडांची हानी
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
भागवत घुगे
रिसोड तालुक्यातील सर्व अधिक मोहजाबंदी धनदाट जंगल असुन आता वृक्षतोडीमुळे विरळ होत आहे
जंगल डोंगरची काळी मैना म्हणून ओळख असलेल्या करवंदांवर यावर्षी हवामानातील बदलाचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. मोहजांबदी वनपरिक्षेत्रात मुबलक प्रमाणात आढळणारी करवंद यावर्षी कमी प्रमाणात दिसून आली. याबरोबरच निसर्गातील रानमेव्यावर अतिक्रमणासह जंगलतोडीचाही गंभीर परिणाम होत आहे.
मांडवा लोणी मोहजाबंदी या ज़ंगलात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत ग्रामीण भागातील रस्त्याकडेला आप-ोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहावयास मिळतात. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आंबा, कलिंगडबरोबरच या काळात रानमेवाही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो; मात्र करवंदाची झुडुपे ही काटेरी आणि घनदाट हिरवी, आकाराने लहान असल्याने शेताच्या कुंपणासाठी मानवाकडून या झुडुपांची मोठ्याप्रमाणात
तोड होत आहे. ससा, रानडुक्करसारखे प्राणी या झुडुपांचा आसरा घेतात, तसेच वनव्याच्या भक्षस्थानीही मोठ्या प्रमाणात पडत असल्याने करवंदाची झुडुपे नामशेष होत चालली आहेत. वर्षातून एकदा मिळणाऱ्या या फळांना उन्हाळ्यात आबालवृद्ध आवर्जून चवीने खाताना दिसतात.
उकाड्यात ही फळे खूप लाभदायक ठरतात. चवीने आंबट-गोड असणारे करवंद खट्टा-मिठा या नावाने देखील ओळखली जातात. करवंद हा रानम वा डोंगरकड्यांवर जंगलात मिळतो. असंख्य काट्यांमध्ये लपून बसलेल्या करवंदामुळे अनेक शारीरिक व्याधी बऱ्या होतात. करवंद हे उतार अन्न आहे. उतार म्हणजे हे खाल्ल्याने इतर औषधांचा गुण जातो व इतर औषधी, गोळ्या, इंजेक्शन लागू पडत नाही. उतार अन्न म्हणून करवंद व जांभूळ या जुळ्या बहिणी आहेत. उतार अन्न असल्यामुळे वर्ण झाल्यास करवंदे मुळीच खात नाहीत.
