*घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा …….
कुरुंदवाड :-घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा अन्यथा स्मार्ट मीटर बसवण्यास येणाऱ्या वर फौंजदारी गुन्हे दाखल करू असा सज्जड इशारा आंदोलन अंकुश च्या वतीने कार्यकारी अभियंता जयसिंगपूर आडके साहेब यांना आंदोलन अंकुश च्या वतीने एका निवेदनाद्वारे
देण्यात आला आहे
सध्या देशात व राज्यात ग्राहकाच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने दमदाटी करून स्मार्ट मीटर बसविले जात आहेत याला संपूर्ण देशात जोरदार विरोध सुरू असून आम्ही देखील याला गेल्या दोन वर्षापासून जोरदार विरोध करत आहे परंतु याचा विचार न करता सक्तीने जबरस्तीने दमदाटी करून ग्राहकांना खोटेनाटे सांगून तसेच घरात कोणी नसल्याचे पाहून बेमालूम पणे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत महावितरण ही वीज सेवा पुरवणारी कंपनी असून याचा मुख्य घटक वीज ग्राहक आहेत “ग्राहक देवो भव” असे आपल्याकडे ग्राहकाचे वर्णन केले पण याच देवासमान असलेल्या ग्राहकालाच न विचारता सक्तीने त्याच्या घरचे वीज मीटर बदलणे हे पूर्णतः बेकायदेशीर कृती आहे
शिवाय केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांनी लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात स्मार्ट मीटर्स बसवणे कंपल्सरी नसल्याचे व ते जबरदस्तीने बसविले जाणार नाहीत असे सांगितले असताना सुद्धा सक्तीने वीज मीटर बसवणे म्हणजे सर्वच सभागृहाचा अवमान असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
राज्यस्तरावर ग्राहक हिताचा विचार न करता निर्णय घेतले जातात व निर्णय घेतला आहे म्हणून दंडूकशाहीने खालच्या स्तरावर चुकीचे धोरण राबविले जातात हे पूर्णतः चुकीच्या असून ग्राहकाच्या मताचा विचार न करता घेतल्याने ग्राहकाने मानावा असे होत नाही
यापुढे ग्राहकांचे हक्क व अधिकार डावलून सक्तीने वजबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा च प्रयत्न केल्यास महाराष्ट्र मीटर बसवण्यास येणाऱ्या वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल अशा सज्जड इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
यावेळी आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे,प्रभाकर बंडगर, दीपक पाटील,रशीद मुल्ला, दीपक बंडगर,संभाजी शिंदे,संदीप चौगुले,आनंदा पुजारी,गोरक्ष पुजारी, दत्तात्रय पुजारी,अनिल पुजारी,बनाज पुजारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











