नाशिक | प्रतिनिधी अमर पठारे
नाशिक जिल्ह्यातील कश्यपी धरण परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून एका चिमुकल्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पती-पत्नींसह चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील एका लहान मुलाचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी धाव घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने एकामागून एक चौघेही पाण्यात बुडाले.
घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने शोधकार्य राबविण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
चिमुकल्याच्या रडण्यामुळे आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात घडलेली ही घटना अत्यंत हृदयद्रावक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
📍 कश्यपी धरण, नाशिक
📌 पती-पत्नींसह चौघांचा मृत्यू
📌 बचाव करताना घडली दुर्घटना
📌 नाशिकमध्ये शोककळा











