वाशिम जिल्हा प्रतिनिधी
भागवत घुगे
जुन्या काळाचे साधन आता धावपळीच्या जीवनात वापरात आठवणी उजाळा येत आहे गॅस तुटवडा मुळे चुलीवर स्वयंपाक करावा लागतो तसेच विद्युत पुरवठा खंडित काळात थंड पिय ताक लिंबू सरबत आजही मातीच्या भांड्यात वापर करावा लागतो
गेल्या काही दिवसांत
उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने शहरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. वाढत्या तापमानासोबतच बाजारपेठेतही उन्हाळी वस्तूंची रेलचेल दिसू लागली असून मातीचे माठ, टोपी, ज्यूस सेंटर आणि रसवतीगृहावर नागरिकाची गर्दी गरिबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या मातीच्या माठांना पुन्हा मोठी मागणी निर्माण झाली आहे.
बाजारात विविध आकार आणि रंगांमध्ये उपलब्ध असलेले माठ ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
नैसर्गिक थंडावा देणारे आणि आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने अनेक नागरिक पुन्हा माठातील पाण्याकडे वळताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, माती नैसर्गिकरित्या अल्कलाइन असल्याने माठात ठेवलेले पाणी शरीरातील अॅसिडिक
माठातील पाणी का ठरते फायदेशीर ?
रसायनमुक्त पाणी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये आढळणारे हानिकारक केमिकल टाळता येते.
नैसर्गिक थंडावा : माठातील सूक्ष्म छिद्रांमुळे पाणी नैसर्गिकरीत्या थंड होते.
खनिजांचे गुणधर्म : मातीतील खनिजे व ऊर्जा पाण्यात मिसळून ते अधिक गुणकारी बनते.
मेटॅबॉलिझम सुधारणा : माठातील पाणी पिण्यामुळे पचनक्रिया सुधारते.
उष्माघातापासून बचाव : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत होते.
घशासाठी लाभदायक : फ्रिजच्या पाण्यापेक्षा माठातील पाणी सर्दी-खोकल्यात सुरक्षित मानले जाते.
वातावरण कमी करण्यास मदत करते. त्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण मिळू शकते. एकूणच, वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर माठांचा वापर केवळ परंपरा नसून आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा भाग बनत असल्याचे चित्र रिसोड बाजारात दिसून येत आहे.
पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय
वीजपुरवठा खंडित होण्याच्या परिस्थितीत माठ हा स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरतो. त्यामुळे अनेक कुटुंबे पुन्हा पारंपरिक पद्धतीकडे वळताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, माठ खरेदी करताना शक्यतो हाताने बनवलेला माठ निवडावा, जेणेकरून त्याचे नैसर्गिक गुणधर्म अधिक प्रभावी राहतात.
