कन्नड दिनांक 12 /6
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त साधून भीम गीतांच्या कार्यक्रमातून समाज प्रबोधन करणार्या श्री “सुनील खरे ” मनमाड कर यांच्या बुलंद आवाजात जेव्हा गाणे गायले तेव्हा अख्खे कन्नड शहर दुमदुमले.
“रामजी बाबा ला आनंद झाला ..जवळ घेऊन बोले भीमाला…म्हणे मिटली माझी तमा… जशी पाहिजे होती सून आम्हाला तशी भेटली बरका रमा.. हे गीत तर भीम गीतांचा कळस च या गाण्यावर आबालवृद्ध जणू बाबासाहेब-रमाचे विवाहात च आहोत की काय असे बेधुंद होऊन नाचले.
“सतरा ठीगळाचं एकच पान. …. या आणि अशा अनेक बहारदार गीतांनी परिसर अक्षरशः बुद्ध मय झाला. या रमाई च्या गीतावर तरूण तरूणी यांनी ठेका धरला.
या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी लातूरचे मुद्रांक जिल्हाधिकारी श्री गोरख सातदीवे, ग्रामसेवक राजेंद्र पगारे, अनिल सिरसाट, गणेश मोरे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शिरस, योगेश अंभोरे, संजय भालेराव, मनोहर जाधव, राजू धनेधर, मनोहर जाधव, शरद थोरात,
विद्रोही साहित्य सम्मेलन च्या कवियत्री प्राध्यापक डॉ श्रीमती प्रतिभा अहिरे आणि बर्याच जनसामान्यांच्या प्रतिसाद लाभला.
आजही भीम गीतांचा कार्यक्रम आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तर्फे कळविण्यात आले आहे
तरी सर्व समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव समिती कडून कळविण्यात आले aahe.








