बातमी :
भातकुली (प्रतिनिधी) : तालुक्यातील साऊर गावात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून हे धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गावात वाढत्या अवैध व्यवसायांमुळे चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दादा भामोदकर कृषी विद्यालयासमोरही मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर मानवाधिकार कानून एवं सुरक्षात्मक भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने वलगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करून गावातील शांतता व सुरक्षितता राखावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युवा अर्पण सोनी, अमरावती जिल्हा सचिव मिलिंद भोरे, जिल्हा कोषाध्यक्ष विकास गावंडे, भातकुली तालुका अध्यक्ष आशिष शर्मा, उपाध्यक्ष संदीप काटोले, तालुका सचिव दादाराव चोपडे, कोषाध्यक्ष प्रफुल निंभोरकर तसेच संजय माहोरे, शिवा सोळंके, यश देशमुख आदी उपस्थित होते.











