हिंगणघाट, दि. १४ एप्रिल २०२६ :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हिंगणघाट शहरातील आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देत सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रफुल बाडे, नगरपरिषद गटनेते भूषण पिसे, बांधकाम सभापती चंदू माळवे, नगरसेवक धनंजय बकाने, विक्रांत भगत, रवींद्र रोहनकर तसेच समाजसेवक समीर धारकर, सुबोध मांडवे, पांडुरंग बालपांडे, माजी नगरसेवक अमन काळे, संजय मगर, राजू माडेवार, डॉ. मंदार मराठे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांत व प्रेरणादायी वातावरणात पार पडला असून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.









