• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आदर्श शिंदेंच्या पहाडी सुरांनी धाराशिव ‘भीममय’

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
आदर्श शिंदेंच्या पहाडी सुरांनी धाराशिव ‘भीममय’
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

भाजपाच्या भीम महोत्सवाला जनसागराचा प्रतिसाद

RelatedPosts

वीर योद्धा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना फळे व पाणी बाटल्यांचे वाटप; माऊलींच्या भक्तांची सेवाभावी परंपरा जपली

वाहेगाव-साळ परिसरात लोडशेडिंगमुळे विद्यार्थी व नागरिक त्रस्त; वेळ बदलण्याची मागणी

रेणापूरमध्ये SIR-2026 मोहिमेला वेग; मतदार पडताळणीचे काम युद्धपातळीवर

धाराशिव, (जिल्हा प्रतिनिधी :-विकास वाघ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून धाराशिव नगरीत क्रांतीच्या सुरांचा अभूतपूर्व सोहळा रंगला. महाराष्ट्राचा लाडका गायक आदर्श शिंदे यांच्या बुलंद आणि थरारक आवाजाने संपूर्ण जिल्हा परिषद मैदान दणाणून गेले. निमित्त होते, आमदार राणाजगजितसिंह पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या प्रेरणेतून मल्हार पाटील आणि सौ. साक्षी मल्हार पाटील यांनी आयोजित केलेल्या ‘भीम महोत्सवा’चे.

कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. आदर्श शिंदे यांनी आपल्या पहाडी आवाजात भीमगीते सादर करताच, हजारोंच्या संख्येने उपस्थित भीम अनुयायांनी ‘जय भीम’चा जयघोष केला. प्रत्येक गीतातून मिळणारी प्रेरणा आणि समतेच्या विचारांनी उपस्थितांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली. हा केवळ संगीताचा कार्यक्रम न ठरता, समाज परिवर्तनाचा एक जिवंत जागर ठरला.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे भाजप युवा नेते मल्हार पाटील यांचा सक्रिय सहभाग. लेडीज क्लबच्या माध्यमातून आजवर अनेक कार्यक्रम झाले, मात्र मल्हार व डॉ. साक्षी पाटील यांच्या पुढाकारातून प्रथमच एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांच्या या पहिल्याच प्रयत्नाला धाराशिवकरांनी उदंड प्रतिसाद देत हा सोहळा यशस्वी केला. कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांच्या गर्दीने मैदान फुलून गेले होते. “प्रत्येक शब्दात अभिमान आणि प्रत्येक ठेक्यात क्रांती” असा अनुभव घेत तरुणाईने या गीतांवर ताल धरला. जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासात हा कार्यक्रम एक मैलाचा दगड ठरला असून, बाबासाहेबांच्या विचारांचे नवचैतन्य या माध्यमातून घराघरात पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Tags: Vikas Wagh
Previous Post

पालकमंत्री सरनाईकांच्या आदेशान्वये अजय पाटील यांचे येडेश्वरी यात्रा काळात नियोजन यशस्वी; एसटी च्या उत्पन्नात६२ लाख ६६ हजारांची घसघशीत वाढ.!

Next Post

चुरमुरा येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

वीर योद्धा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना फळे व पाणी बाटल्यांचे वाटप; माऊलींच्या भक्तांची सेवाभावी परंपरा जपली

July 17, 2026
24
ताज्या घडामोडी

वाहेगाव-साळ परिसरात लोडशेडिंगमुळे विद्यार्थी व नागरिक त्रस्त; वेळ बदलण्याची मागणी

July 17, 2026
13
ताज्या घडामोडी

रेणापूरमध्ये SIR-2026 मोहिमेला वेग; मतदार पडताळणीचे काम युद्धपातळीवर

July 16, 2026
15
ताज्या घडामोडी

महिला स्वायंसहाय्यता बचतगटांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न

July 16, 2026
7
ताज्या घडामोडी

मुंगसापूर बोगस डॉक्टरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा अहवाल; उपोषणानंतर प्रशासनाची कारवाई

July 16, 2026
67
ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी २०२६’ प्रकल्पास शुभेच्छा

July 16, 2026
4
Next Post
चुरमुरा येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

चुरमुरा येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

वीर योद्धा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना फळे व पाणी बाटल्यांचे वाटप; माऊलींच्या भक्तांची सेवाभावी परंपरा जपली

July 17, 2026

पावसाच्या मध्यम सरींमुळे परंडा तालुक्यातील पिकांना जीवदान; शेतकऱ्यांमध्ये समाधान

July 17, 2026

गोधणी येथे मानसिक आजाराने त्रस्त युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In