महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने बबनराव गारुळे यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास गावातील सरपंच जगदीश वसंतराव दिपके, ग्रामविकास अधिकारी हालबुर्गे, ग्रामपंचायत सदस्य सय्यद आयात महबूब, उपसरपंच सुधीर बिरगड यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा गौरव करण्यात आला असून, सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा जयंती सोहळा साजरा करण्यात आला.









