श्रीगोंदा (प्रतिनिधी) : यूपीएससीच्या ‘प्रतिभा सेतू’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘निपुण सेतू’ योजना राबविण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून लाखो एमपीएससी स्पर्धा परीक्षार्थींना नवी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार विक्रमजी बबनराव पाचपुते यांचा कृतज्ञता सोहळा व विद्यार्थी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा थेट मांडण्याची संधी मिळणार असून, त्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे ठोस पाठपुरावा करण्यासाठी निवेदन सादर करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रश्न, अडचणी व सूचना मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हा कृतज्ञता सोहळा व विद्यार्थी संवाद कार्यक्रम मंगळवार, दि. 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे पार पडणार आहे.










