पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या बदलीने आदिवासी बांधवांत खूशी की लहर!
अक्राणी प्रतिनिधी: नंदुरबार जिल्ह्याचे वादग्रस्त पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांची अपर पोलीस महासंचालक कार्यालयात स्टॉफ ऑफीसर म्हणून बदली झाल्यानंतर दिनांक १ मे २०२६ रोजी आदिवासी बांधवांनी फटाके फोडून वाजत गाजत नाचत आनंदोत्सव व जल्लोष साजरा केला. पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या वर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.नंदुरबार जिल्ह्यातील ९ सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी, राजकीय पुढाऱ्यांच्या इशा-यावर व सुपारी घेऊन सुडबद्धीने , भ्रष्ट पद्धतीने अवैध, बेकायदेशीर, अप्रमाणिकपणे आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरूपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणे.जय वळवी या आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार येथे आदिवासी समाजाकडून काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला कट कारस्थान रचून दंगलीचे स्वरूप देणे.३०० पेक्षा अधिक निरपराध आदिवासी संघटना पदाधिकारी व आदिवासी बांधवांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून रात्री बेरात्री अटक करणे.
पोलिस कोठडीत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करणे, हत्या करण्याचा प्रयत्न करणे. पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण प्रकरणाचे सिसीटिव्ही फुटेज, पुरावे नष्ट करणे. पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण प्रकरणी स्वतः ला वाचविण्यासाठी डाक्टरवर दबाव टाकून व पैसे देऊन मॅनेज करून मेडिकलचा दुसरा रिपोर्ट बदलायला लावणे.सुशिलकुमार पावरा यांच्या वडिलांच्या हत्येमागे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांचा हात असल्याचा आरोप, पोलिसांच्या विरोधात सोशल मिडियावर पोस्ट टाकणा-या तरूणांना बळजबरीने पोलिस ठाण्यात बोलावून धमकावणे, मोबाईल हिसकावून घेणे, मोबाईल जप्त करणे.बळजबरीने जप्त केलेले मोबाईल्स परत न देणे.आदिवासी तरूणांचे इंस्टाग्राम आयडी बंद करणे, पोलिसांच्या विरोधात बातम्या छापणा-या पत्रकारांना धमकी देणे, दबाव तंत्र वापरणे.पोलिसांच्या विरोधात बातम्या छापणा-या निर्भीड पत्रकारांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून अटक करायला लावणे.
भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांना वारंवार वाचवणे, तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे.आदिवासी सामाजिक संघटनांना व पदाधिकाऱ्यांना दहशतवादी,टोळी ठरवणे.निरपराध लोकांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून गुन्हेगार ठरवून गुन्हेगारी वाढवणे.आमदार चंद्रकांत रघुवंशी सह जिल्ह्यातील भूमाफियांचे संरक्षण करणे.सट्टा ,जुगार ,मटका,दारू,गुटखा,गांजा, हातभट्टी ,अवैध वाहतूक, अवैध लॉजमधील धंदे इत्यादी अवैध धंदे व व्यवसाय वाढवणे, अवैध धंद्याना संरक्षण देणे.विना वारंट, समन्स किंवा काही कारण नसतांना रात्री बेरात्री घरात घुसून सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करायला लावणे.नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात जनतेचे एवढे आरोप असणारा हे एकमेव आयपीएस वादग्रस्त पोलिस अधीक्षक श्रवण दत्त ठरले. नंदुरबार जिल्ह्यातून एक मोठी पनौती गेली म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून हा आनंदोत्सव व जल्लोष साजरा केला.






