इंदापूर (प्रतिनिधी) : इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमानिमित्त गावातून श्रींची भव्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. गावातील स्वामीभक्त महिलांनी चौकाचौकात आकर्षक रांगोळ्या काढून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. महादेव भजनी मंडळानेही दिंडीत सहभाग नोंदवून वातावरण भक्तिमय केले.
पालखी मंदिरात आल्यानंतर सायंकाळी ८ ते ९ या वेळेत ह.भ.प. श्री रेवणसिद्ध सलगर महाराज (पंढरपूर) यांचे स्वामी चरित्रावर आधारित प्रवचन झाले. त्यानंतर जप व आरती संपन्न झाली.
कार्यक्रमानंतर श्री आप्पासाहेब तुळशीराम बोंद्रे यांच्या वतीने सर्व स्वामीभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामस्थ व स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रांगोळी सेवा सौ. शितल सुनील सुतार यांनी दिली, तर फुलांची सेवा श्री महादेव मारुती माळी यांनी केली. प्रवचन सेवेचे मानधन श्री राजाराम संभाजी जाधव यांनी दिले.
यावेळी निमसाखर गावचे दिव्यांग पत्रकार कु. गणेश धनवडे यांना ह.भ.प. श्री रेवणसिद्ध सलगर महाराज यांच्या हस्ते “स्वामी सेवा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.





