गडचिरोली (प्रतिनिधी) : मौजा कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन करून त्यांना अधिक चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच या माध्यमातून रोजगारनिर्मितीला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला धनपाल मिसार, उपसरपंच गजानन सेलोटे, अरुण कुंभलवार, ईश्वरी राऊत, दिगंबर धोटे, गोविंदजी बरडे, प्रल्हाद राऊत, संतोष धोटे, देशमुख सर, कुथे सर, शरद धोटे, सुनील पारधी, एकनाथ पत्रे, प्रदीप तुपट, विवेक राऊत, विनायक अलोने, मनोहर राऊत, कैलास डेंगानी, अभि शेंडे, गीताबाई धोटे, शोभा धोटे, निकिता धोटे, प्रमिला राऊत आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे परिसरातील कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











