रिसोड – प्रतिनिधी
रिसोड रिसोड शहरात वीजपुरवठ्याच्या सतत होणाऱ्या खंडित समस्येमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. दिवसाला तब्बल वेळा वीज ये-जा होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात मोठ्या प्रमाणात स्मार्ट मीटर बसवण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात वीजपुरवठ्याची गुणवत्ता मात्र दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
यूनिट कमी व बिल जास्त
वारंवार होणाऱ्या ट्रिपिंगमुळे आणि व्होल्टेज कमी-जास्त होत असल्याने अनेक नागरिकांचे फॅन, टीव्ही, कुलर यांसारखी विद्युत उपकरणे बंद पडत आहेत. यामुळे नागरिकांना हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
विशेष म्हणजे, या गंभीर समस्येकडे महावितरण कंपनीचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अधिकारी फक्त घराघरात स्मार्ट मीटर बसवण्यात व्यस्त असून, बीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना दिसून येत नाही. दरम्यान, रिसोड येथील स्थानिक
पूर्णपणे शांत असल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ आश्वासने देण्यापुरतेच त्यांचे काम मर्यादित राहिले आहे, अशी तीव्र टीका होत आहे.
‘ असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.








