• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘स्वच्छतेत नंबर वन’चा दावा फोल; अवकाळी पावसाने येणेगुर ग्रामपंचायतीच्या नियोजनाचा बोजवारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘स्वच्छतेत नंबर वन’चा दावा फोल; अवकाळी पावसाने येणेगुर ग्रामपंचायतीच्या नियोजनाचा बोजवारा
0
SHARES
102
VIEWS
Ad 1

उमरगा प्रतिनिधी
दि. ०७ मे २०२६

उमरगा तालुक्यातील येणेगुर गावात अवकाळी पावसाने ग्रामपंचायतीच्या स्वच्छता आणि नियोजनाच्या दाव्याची पोलखोल केली आहे. स्वच्छतेत ‘नंबर वन’ असल्याचा दावा करणाऱ्या गावात आज झालेल्या पावसामुळे मुख्य गटारी तुंबून घाण पाणी थेट गोरगरिबांच्या घरात शिरले. तसेच जिल्हा परिषद शाळेसमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

गावातील गटारींची नियमित साफसफाई आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पावसाच्या पहिल्याच फटक्यात गटारींचे पाणी रस्त्यावर आले आणि त्यानंतर थेट घरांमध्ये शिरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

येणेगुर गाव हे शासकीय कर वसुली आणि स्वच्छतेच्या पुरस्कारांसाठी ओळखले जात असले, तरी प्रत्यक्षात पावसाळ्यापूर्वीची तयारी अपुरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. “आम्ही कर वेळेवर भरतो, पण पावसाळ्यात घाण पाण्यात राहावे लागत असेल, तर स्वच्छतेच्या पुरस्काराचा उपयोग काय?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

गावातील तुंबलेल्या गटारींची तात्काळ स्वच्छता करण्यात यावी, सांडपाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी तसेच गावाबाहेर योग्य निचरा होईल असे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

आता या गंभीर समस्येकडे प्रशासन किती गांभीर्याने लक्ष देते आणि कोणती उपाययोजना करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Tags: Vishwanath Swami
Previous Post

वादळी पावसाने घानवळ गावातील कुटुंबावर संकट; घरावरील पत्रे उडाली, मोठे नुकसान

Next Post

भूमी अभिलेख कार्यालयाला कायमस्वरूपी अधीक्षकांची प्रतीक्षा; नागरी हित संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
9
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post

भूमी अभिलेख कार्यालयाला कायमस्वरूपी अधीक्षकांची प्रतीक्षा; नागरी हित संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In