शिरूर : प्रतिनिधी
नुकताच दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्यभरात विद्यार्थिनींनी यंदाही बाजी मारली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जय मल्हार शिक्षण संस्थेच्या स्व. आबासाहेब पाचंगे विद्यालयाने आपल्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने परिसरातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांच्या यशासाठी मुख्याध्यापक सोनवणे सर तसेच सर्व सहशिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









