• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कमी पाण्यात शेती करणे काळाची गरज : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in Blog
0
कमी पाण्यात शेती करणे काळाची गरज : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

चाकूर प्रतिनिधी

बोथी (ता. चाकूर) येथे गाळमुक्त धरण – गाळमुक्त शिवार अभियानांतर्गत नदी खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ तसेच जलतारा प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना कमी पाण्यात शेती करण्याचे आवाहन केले.

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

यावेळी व्यासपीठावर लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, सिद्धी शुगर अलाईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सिद्धेश्वर अंकलकोटे, उपसभापती भुजंग शिंदे, जिल्हा परिषद सदस्य भानुदास पोटे, नगरसेवक भागवत फुले, शिवदर्शन स्वामी, राम कसबे, भालचंद्र चाटे, धनंजय चाटे, मधुकर मुंडे, नरेंद्र हाके, विष्णू तीकटे, अनिल वाडकर, संदीप शेटे, सचिन तोरे, कार्यकारी अभियंता जावेद पटेल, गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे, नायब तहसीलदार दिगंबर स्वामी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, “जलतारा प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून बोथी गावातील शेतकऱ्यांनी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा. आपल्या गावातील पाणी गावातच जिरविले पाहिजे. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल आणि पाण्याचे स्त्रोत अधिक उपलब्ध होतील.”

पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनासाठी माती परीक्षण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता कमी पाण्यात शेती करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक बळी पाटील यांनी केले. सिद्धी शुगर अलाईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांनीही जलतारा प्रकल्पाविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मधुकर कांबळे यांनी केले.

चौकट : जलतारा प्रकल्प काय?

जलतारा प्रकल्पांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या एका एकर शेतात ५ फूट बाय ५ फूट आकाराचा एक खड्डा खोदायचा आहे. या खड्ड्यांमुळे पावसाचे लाखो लिटर पाणी थेट जमिनीत मुरते आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होते. त्यानंतर हेच पाणी विहिरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होते.

यंदा ‘एल निनो’चे संकट येण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गावात किमान एक हजार जलतारा खड्डे तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी यावेळी केले.

Previous Post

खंडागळे यांच्या झेडपी उत्पन्न वाढीच्या प्रस्तावाने वेधले लक्ष

Next Post

लातूर पोलिसांची ‘खाकीतील माणुसकी’; १० लाखांचे दागिने मूळ मालकास सुरक्षित परत

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
20
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
9
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
15
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
29
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
24
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
8
Next Post
लातूर पोलिसांची ‘खाकीतील माणुसकी’; १० लाखांचे दागिने मूळ मालकास सुरक्षित परत

लातूर पोलिसांची ‘खाकीतील माणुसकी’; १० लाखांचे दागिने मूळ मालकास सुरक्षित परत

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In