• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मारेगाव येथे समाधान शिबिराचे आयोजन; नागरिकांकडून प्रशासनावर तीव्र नाराजी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

मारेगाव प्रतिनिधी :

मारेगाव तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या आणि शासकीय योजनांबाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मार्केट यार्ड परिसरात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हे शिबिर अनेक नागरिकांच्या मते अपेक्षाभंग करणारे ठरल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

RelatedPosts

अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश

येवला-मनमाड रस्त्याच्या कामाला गती; संपूर्ण रस्त्याचे होणार नव्याने डांबरीकरण

सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे अतिदुर्गम भागात आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

शिबिरात सहभागी होण्यासाठी तालुक्यातील अनेक नागरिकांनी दिवसभर उन्हात थांबून आपली उपस्थिती दर्शविली. मात्र, “आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे विविध योजनांचा लाभ मिळू शकणार नाही,” असे सांगून अनेकांना रिकाम्या हाताने परत पाठविण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

यावर संतप्त प्रतिक्रिया देताना नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की, “जर आमचे आधार कार्ड अपडेट नसते, तर आम्हाला बँकेचे व्यवहार आणि रेशन कार्डवरील धान्य कसे मिळाले?” त्यामुळे आधार पडताळणी प्रक्रियेत प्रशासनाचा घोळ असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

या शिबिरामुळे सुमारे ७० टक्के नागरिकांची मजुरी बुडाली असून, कोणताही ठोस लाभ न मिळाल्याने त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. महसूल विभागाने महसूल वसुलीत प्रथम क्रमांक मिळविण्यापेक्षा नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

तसेच घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, नगरपंचायतीमार्फत मंजूर कामांचे धनादेश क्लिअर का होत नाहीत, असे प्रश्नही नागरिकांनी प्रशासनासमोर उपस्थित केले.

स्थानिक प्रशासन या गंभीर तक्रारींकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि नागरिकांच्या समस्यांवर काय तोडगा काढते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. स्थानिक नागरिकांनीच या समस्या प्रतिनिधींना सांगितल्या असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Tags: Pranay Khaire
Previous Post

तालुक्यातील कास्तकार आर्थिक संकटात; नव्या कर्जवाटपासाठी प्रशासनाकडे धाव

Next Post

मारेगावमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांची नाराजी

Related Posts

अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश
ताज्या घडामोडी

अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश

May 21, 2026
0
येवला-मनमाड रस्त्याच्या कामाला गती; संपूर्ण रस्त्याचे होणार नव्याने डांबरीकरण
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्याच्या कामाला गती; संपूर्ण रस्त्याचे होणार नव्याने डांबरीकरण

May 21, 2026
63
ताज्या घडामोडी

सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे अतिदुर्गम भागात आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

May 21, 2026
27
ताज्या घडामोडी

यावल शहरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; काही पेट्रोल पंप बंद, उर्वरित ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा

May 21, 2026
43
चास नळीमध्ये पेट्रोल टंचाई; वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा
ताज्या घडामोडी

चास नळीमध्ये पेट्रोल टंचाई; वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा

May 21, 2026
9
जीवनातील ७५ वे रक्तदान करून विलासराव पाटील चाकूरकर यांचा प्रेरणादायी आदर्श
ताज्या घडामोडी

जीवनातील ७५ वे रक्तदान करून विलासराव पाटील चाकूरकर यांचा प्रेरणादायी आदर्श

May 21, 2026
10
Next Post

मारेगावमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांची नाराजी

ताज्या बातम्या

अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश

अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश

May 21, 2026
कोकण दर्शनमधून घडणार संगमेश्वरची खास सफर; २२ मे रोजी आकाशवाणी रत्नागिरीवर विशेष प्रसारण

कोकण दर्शनमधून घडणार संगमेश्वरची खास सफर; २२ मे रोजी आकाशवाणी रत्नागिरीवर विशेष प्रसारण

May 21, 2026
युवा नेते काळे यांच्या संकल्पनेतून धर्मवीरांना आगळे वेगळे अभिवादन

युवा नेते काळे यांच्या संकल्पनेतून धर्मवीरांना आगळे वेगळे अभिवादन

May 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In