प्रतिनिधी :
तालुक्यातील मोजे हिंगोणी बु. येथे प्रस्तावित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला ग्रामसभेत तीव्र विरोध करण्यात आला. गावातील भील समाजासाठी घरकुल व सामाजिक कार्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
ग्रामस्थांनी सांगितले की, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी प्रस्तावित करण्यात आलेली जागा ही गावातील आदिवासी व भील समाजाच्या भविष्यासाठी आवश्यक असून, त्या ठिकाणी घरकुल योजना, समाजमंदिर व इतर सामाजिक उपक्रमांसाठी जागा राखीव ठेवण्यात यावी. प्रशासनाने ग्रामस्थांच्या भावना लक्षात न घेता प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व बिरसा आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावातील आदिवासी समाज अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे प्रथम स्थानिकांच्या पुनर्वसन व सामाजिक गरजांना प्राधान्य देण्यात यावे.
मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिषदेकडून देण्यात आला आहे.
यावेळी बिरसा आर्मीचे प्रदेशाध्यक्ष मनोज, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा महासचिव अॅड. दारासिंग पावरा, सूरज भिल, कैलास बारेला, जिल्हाध्यक्ष अजय भिल, बापू भिल, प्रकाश भिल, सुरेश भिल, अर्जुन भिल, दगडू भिल, भाऊसाहेब भिल, गणेश भिल, विनोद भिल, अनिल भिल, शंकर भिल, गोपाल भिल, अरविंद भिल, अरुण भिल, रमेश भिल, संतोष पावरा आदी उपस्थित होते.









