जालना प्रतिनिधी
जालना येथील वृंदावन धाम वेद माता गायत्री मंदिर परिसर, गायत्री नगर येथे अधिक मासानिमित्त “श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ”चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा दिनांक २१ मे २०२६ ते २७ मे २०२६ दरम्यान दररोज दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
ही कथा वृंदावन धाम येथील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय भागवत कथा प्रवक्ता परमपूज्य आचार्य गौरव कृष्णजी गोस्वामी यांच्या सुमधुर वाणीतून सादर होत आहे. या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अधिकाधिक भक्तांनी उपस्थित राहून कथाश्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हरे कृष्णा सत्संग समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच दिनांक २८ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत “राम कथा श्रीराम प्रगट्य उत्सव” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम श्री किशोरजी तिवारी यांच्या सुमधुर वाणीतून होणार असून त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
धार्मिक वातावरणात आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.









