श्रीमद् भागवत कथा : चौथ्या पुष्पात भक्तीचा आनंद
जालना (प्रतिनिधी): मोठे पद, प्रतिष्ठा , वैभव,उंची गाठली की जबाबदारी वाढते .समाजाची दृष्टी आपल्यावर असते .आपल्या हातून अनुचित कृत्य घडल्यास समाज निंदा करतो आणि प्रभाव असेल तर आपल्या चुकीचही अनुकरण करतो . मोठ्या व्यक्तींनी जवाबदारीने कर्तव्याचे पालन करावे. प्रत्येकाच्या कर्माची नोंद भगवंताकडे असून आपण आपल्या हातून झालेल्या चुका ,पाप , अपराध मान्य केल्यास अर्धे पाप नष्ट होते. भगवंत पाहत असल्याचे भान ठेवून कर्म करा असा मौलिक हितोपदेश आचार्य परमपूज्य गौरव कृष्ण गोस्वामीजींनी दिला.
हरे कृष्णा सत्संग समितीच्या वतीने वेदमाता गायत्री मंदिर परिसरातील वृंदावन धाम येथे परमपूज्य गौरव कृष्ण गोस्वामीजी यांनी अमृतमय वाणीतून आयोजित श्रीमद् भागवत कथेत शनिवारी ( ता .23) चौथ्या पुष्पात” कपिल देवहुती संवाद , ध्रुव चरित्र”यावर विवेचन केले.प्रारंभी मुख्य यजमान गोपाल गोयल , समितीचे अध्यक्ष घनश्यामदास गोयल,हरे कृष्णा सत्संग समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, जगदीश राठी कांतीलाल राठी,यांच्या हस्ते व्यासपीठ पूजन,आरती करण्यात आली.
आचार्य गौरव कृष्ण गोस्वामीजी यांनी गीता ही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास नव्हे तर सर्व जीवांसाठी सांगितलेली कथा मनाचा रस्ता बदलते. ज्यांना मार्ग दिसत नाही त्यांच्यासाठी कथा ही मार्गदर्शक असून कथा श्रवण करतांना विद्वान म्हणून नव्हे तर श्रोता म्हणूनच ग्रहण करावी .जन्मत: मनुष्याला शरीर,परिवार आणि धन प्राप्त होते. स्मशानात हे सगळे सोडून जावे लागते. असे सांगून जीवनाची परम शांती ही प्रभूच्या चरणात असून मृत्यू समयी केवळ भगवंताचीच चर्चा केली पाहिजेत, काळ ,वेळ न पाहता संसारिक जबाबदारी, कर्तव्य पार पाडून गोविंदाशी नाते जोडा, भक्ती योगातूनच खरे कल्याण साध्य होते . असे जीवनाचे सार गौरवकृष्ण गोस्वामीजीनी विषद केले.
जय ,,जय ,,गोविंद, गोविंद ,,गोपाल हरी ,,,भजमन गोविंद गोपाल हरी,,, श्याम प्यारे से जिसका संबंध है, उसको हर घडी, आनंद ही आनंद है…! अशा संगीतमय नामसंकीर्तन आणि भक्ती गीतांवर भाविकांनी ठेका धरत भक्ती रसाचा आनंद लुटला.
शेवटी मुख्य यजमान, दैनिक यजमान गोपाल मानधनी,सागर अग्रवाल यांच्यासह मेघराज चौधरी, प्रसन्ना जाफराबादकर, यशवंत बदनापूरकर, महेश भक्कड,शरद जैस्वाल, हिरालाल पिपरीये,जिजाभाऊ खांडेभराड, शिवनाथ खेडेकर, नारायण दायमा यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
कथास्थळी सामुदायिक भगवद्गीता ग्रुप जुना जालनाच्या वतीने 40 महिलांनी गीता पाठ घेतला. तसेच रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी,चहा, अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी उपमहापौर राजेश राऊत,समितीचे महासचिव सुभाषचंद्र देविदान, अंकुशराव राऊत, वामनराव राऊत,अभय कुलकर्णी, दामोधर बजाज, नरेंद्र मोदी,संघटनमंत्री मनीष तवरावाला,सुशील पाण्डेय, योगेश ठक्कर,पवन जोशी, रामेश्वर जोशी, पुरुषोत्तम मोतीवाला, गोवर्धन अग्रवाल ,सुदेश करवा,नरेश गुप्ता, सुशील खंडेलवाल, रामनिवास गौड, जयप्रकाश श्रीमाळी , सुनील बियाणी,डुंगरसिंह राजपुरोहित,अरुण मित्तल,अमोल बांगड,मनोज पाचफुले, विजय दाड,रामकुंवर अग्रवाल, सुरेंद्र चेचाणी, राजेंद्र राठी, गणेश अग्रवाल, जगदीश प्र.भरतिया, डॉ.मोहन शिंदे,धनराज काबलीये, नरेश केलानी, सुनील भुतिया, रोहित भुरेवाल, भगवान दायमा ,मनोज दायमा, ताराचंद शर्मा, निलेश खंडेलवाल,डॉ. सुदर्शन काळे, गौरव बोरा, दीपक मोदी, रोहित नलावडे, कैलास चंदभनानी, यांच्यासह महिला व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
चौकट
आज श्रीकृष्ण जन्म,नंदोत्सव…!
श्रीमद् भागवत कथा सोहळ्यात रविवारी ( ता.24) प्रल्हाद चरित्र,वामन अवतार, श्रीकृष्ण जन्म, तुफान जल्लोषात नंदोत्सव साजरा केला जाणार असून भाविकांनी पिवळे वस्त्र परिधान करून यावे आणि मोठ्या संख्येने
कथा श्रावणाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.









