खटाव प्रतिनिधी
येत्या २८ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईद पार्श्वभूमीवर कायद्याचे पालन करून सण शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करावा, असे आवाहन संतोष पाटील यांनी केले आहे.
बकरी ईद निमित्त होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या कत्तलखान्यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरी भागातील कुरेशी समाजाने संबंधित नगरपालिकेकडे, तर ग्रामीण भागातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे आवश्यक परवानगीसाठी अर्ज करावेत, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटी ची बैठक शिवतेज हॉल येथे पार पडली. बैठकीत सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे, स्वच्छता, आरोग्य आणि प्राणीसंवर्धन नियमांचे पालन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस निखिल पिंगळे, वैशाली कडूकर, आशिष बारकुल, समीर यादव तसेच जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. दिनेश बोंडे यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते.









