जुन्नर | प्रतिनिधी
जुन्नर तालुक्यातील वडगाव (कांदळी) येथे झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे आठवडे बाजारात मोठी धावपळ उडाली. अचानक आलेल्या पावसाच्या तडाख्यामुळे बाजारातील फळे, भाजीपाला आणि इतर माल पाण्यात वाहून गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

या मुसळधार पावसामुळे गावातील जनजीवनही विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. व्यापाऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणलेला माल काही क्षणांत पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने हतबलता व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा यांनी आठवडे बाजाराला भेट देऊन नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची पाहणी केली. त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
दरम्यान, नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी तसेच प्रशासनाने पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
