आजरा | प्रतिनिधी
निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता निवडणुकीनंतर क्वचितच पाहायला मिळते. मात्र या पारंपरिक राजकारणाला छेद देत जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. सुधीरभाऊ देसाई आणि पंचायत समितीच्या उपसभापती सौ. यशोदा पोवार यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवत धनगरवाड्यातील विकासकामांचा दणक्यात शुभारंभ केला.
निवडणुकीदरम्यान “माझा पहिला निधी धनगरवाड्याच्या विकासासाठी वापरणार” असे आश्वासन देत दिलेला शब्द त्यांनी पूर्ण करत विकासकामांना सुरुवात केली. ग्रामस्थांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमामुळे केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृती करणारे नेतृत्व म्हणून सुधीरभाऊ देसाई यांची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
कार्यक्रमावेळी बोलताना सुधीरभाऊ देसाई म्हणाले,
“राजकारण हे निवडणुकीपुरतं असतं, पण दिलेला शब्द हा पुढील पाच वर्षांचा बांधिलकीचा भाग असतो. धनगरवाड्याच्या नागरिकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कामाच्या माध्यमातून नक्कीच सार्थ ठरवेन.”
या विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी पंचायत समिती उपसभापती सौ. यशोदा पोवार, स्व. राजारामबापू देसाई फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. वृषाल आण्णा हुक्केरी, बाजार समिती संचालक श्री. युवराज दादा पोवार, तसेच बांधकाम विभागाचे प्रमुख नाईक साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ग्रामस्थांनी या कामांचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे सुरू झाल्याने धनगरवाड्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.











