अक्राणी / म्हसावद (नंदुरबार) | प्रतिनिधी | २४ मे २०२६
नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद गावासाठी अभिमानास्पद ठरलेली घटना घडली आहे. येथील सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भाऊ अहिरे यांना प्रतिष्ठित “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६” जाहीर झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार तसेच सामाजिक समतेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर समाजकार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.
मिलिंद अहिरे यांनी सामाजिक क्षेत्रात विशेषतः शैक्षणिक विकास, आदिवासी कल्याण आणि जनजागृती या क्षेत्रांत सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागात सकारात्मक बदल घडवून आणण्यात मदत झाली आहे.
पुरस्कार जाहीर होताच म्हसावद व संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला.
पुरस्कार वितरण सोहळा लवकरच दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
मिलिंद अहिरे यांच्या या यशाबद्दल ग्रामपंचायत म्हसावद, स्थानिक पदाधिकारी तसेच जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या कार्यामुळे गावाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाल्याची भावना व्यक्त होत आहे.










