भूम | प्रतिनिधी
भूम शहरातील रविंद्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत तालुक्यात विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी संजना अमोल बळे हिने २६२ गुण मिळवत भूम तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच इयत्ता पाचवीतील समर्थ रामेश्वर घोळक याने २५८ गुण मिळवत भूम केंद्रातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
या परीक्षेत इयत्ता पाचवीतील ३२ विद्यार्थी तर इयत्ता आठवीतील १५ विद्यार्थी पात्र झाले असून मोठ्या संख्येने विद्यार्थी पात्र ठरणारी तालुक्यातील रविंद्र हायस्कूल ही एकमेव शाळा ठरली आहे.
इयत्ता पाचवी पात्र विद्यार्थ्यांमध्ये समर्थ सोलंकी (२५८ गुण), समर्थ रेपाळ (२२४), वेदांत मुंजाळ (२२४), रुद्र भोळे (२०४), आरोही रोडगे (२०४), तेजश्री गायकवाड (१९४), संस्कृती सुपेकर (१८२), प्रगती गडदे (१८०), रेहान शेख (१८०), स्वरा वाघमारे (१७४), शर्वरी पवार (१७२), संस्कार सुपेकर (१७०), आयुष थाटे (१६८), समर्थ कोळी (१६६), चेदिका मुंडेकर (१६६), जेयस भोसले (१६६), अभिमन्यू डोके (१६६), मृण्मयी भागवत (१६२), सई चालगडे (१५८), त्रिशा म्हेत्रे (१५८), पुष्कराज होळकर (१५६), आयुष भोसले (१५४), रोशनी शेख (१५२), भक्ती जगदाळे (१४८), ईश्वरी मोळवणे (१४८), प्रीतम बोराडे (१४६), आर्या कारकर (१४६), श्रुती बाग (१४२), अर्जुन कुंभार (१४०), शिवराज शेळके (१३४), विजय माने (१२४) यांनी यश मिळवले आहे.
इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांमध्ये संजना बळे (१६२ गुण, तालुक्यात प्रथम), चुगंधरा शिदे (२५४), आरोही सुळ (२२८), मयुरी मुंजाळ (२२४), प्रणिती जाधव (२०८), श्रीजा गावकवाड (२०४), अनुष्का ढोके (१९८), अदिती चौधरी (१८६), श्रीकर जाधवर (१८२), अथर्व भायगुडे (१७४), शार्दुल म्हेत्रे (१०२), ज्ञानेश्वरी दुधाळ (१९८), यश जगदाळे (१५४), तनुजा झांबरे (१३८) यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना शिक्षक शर्मिला पाटील, रेश्मा केळे, प्रवीण राऊत, सुधीर पालखे, अनिल धनवटे, विलास सलगर, संकटक गडदे, शहाजी पुलवळे व आकाश भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव आर. डी. सुळ, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे व संपूर्ण शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.









