• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोणार उद्यान असुरक्षिततेच्या छायेत; प्रशासनावर नागरिक व लोकप्रतिनिधींचा संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
लोणार उद्यान असुरक्षिततेच्या छायेत; प्रशासनावर नागरिक व लोकप्रतिनिधींचा संताप
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

लोणार | प्रतिनिधी

लोणार नगरपालिकेच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चर्चेत आले असून उद्यानातील सुरक्षा व सुविधांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

RelatedPosts

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

उद्यानातील हरणाची मूर्ती गायब झाल्याची घटना, रात्रीच्या वेळी बंद असणारे दिवे आणि त्यामुळे निर्माण होणारा अंधार यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि लहान मुलांपर्यंत सर्वांसाठी हे उद्यान असुरक्षित ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या या उद्यानाकडे प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष म्हणजे जबाबदारीपासून पळ काढण्यासारखे असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अंधाराचा फायदा घेत संशयित व्यक्तींची वर्दळ वाढत असल्याची चर्चाही परिसरात सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक श्यामभाऊ राऊत यांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “उद्यान हे जनतेच्या विश्वासाचे ठिकाण आहे. येथे सुरक्षितता आणि सुविधा राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. हरवलेली हरणाची मूर्ती शोधून काढावी, लाईट व्यवस्था तत्काळ सुरू करावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण द्यावे.”

तसेच त्यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की, “घटना घडल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा घटना होऊ नये यासाठी सतर्क राहणे अधिक महत्त्वाचे आहे.”

याच पार्श्वभूमीवर सामाजिक नेते कैलास भाऊ अंभोरे यांच्या वक्तव्याचीही चर्चा सुरू असून, “उद्यानात हरण हरवलं… पण प्रशासनाची जबाबदारी त्याआधीच हरवलेली दिसते,” अशी प्रतिक्रिया परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

नागरिकांकडून उद्यानाची तातडीने दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आणि प्रकाशयोजना सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.

Tags: Dilip Naikwad
Previous Post

रविंद्र हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; भूम तालुक्यात विद्यार्थ्यांचा डंका

Next Post

कन्नड तालुक्यात अवैध सट्टा धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Related Posts

ताज्या घडामोडी

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026
24
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
ताज्या घडामोडी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026
21
सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा
ताज्या घडामोडी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
6
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी
ताज्या घडामोडी

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

July 12, 2026
16
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

July 12, 2026
16
नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव
ताज्या घडामोडी

नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव

July 12, 2026
4
Next Post

कन्नड तालुक्यात अवैध सट्टा धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026

‘आपल्या शरीरावर आपलाच हक्क’; किशोरवयीन मुलींना सुरक्षिततेचे मार्गदर्शन

July 12, 2026
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In