कन्नड तालुका प्रतिनिधी : कन्नड शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा पाणीटंचाईचा त्रास होऊ नये तसेच स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा मिळावा, यासाठी माजी उपनगराध्यक्ष Abdul Javed Seth यांनी अंबाडी मध्यम प्रकल्पाची पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मंगळवारी झालेल्या या पाहणी दौऱ्यात त्यांनी धरणातील पाणीसाठ्याची माहिती घेतली. शहरवासीयांना वेळेवर पाणी मिळते का, नळाला किती दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो, तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेतील अडचणी कोणत्या आहेत, याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.
यावेळी पाणी फिल्टर केंद्राचीही त्यांनी पाहणी केली. पाहणीदरम्यान काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे निदर्शनास आले. यावर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सज्जड दम देत नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले.
“शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत स्वच्छ आणि नियमित पाणी पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा,” असा सल्लाही त्यांनी दिला.
या पाहणी दौर्यात Zakir Patel, Raju Committee, Gokul Rathod, Vitthal Shirse तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







